रायगड : लोकसभेची ही लढाई केवळ सुनिल तटकरे विरुद्ध अनंत गीते एवढी सिमीत नाही. ही लढाई महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आहे. ऐतिहासिक आणि विशेष करून जाणीवपूर्वक संविधान आणि अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करत देशाच्या एकात्मतेला तडा देण्याचा प्रयत्न तथाकथित इंडिया आघाडीच्या माध्यमातून केला जातो आहे. असं म्हणत रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ पेण येथे महायुतीची सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…नगरमध्ये मोठा उलटफेर, वंचितसह MIM , अपक्ष उमेदवार निलेश लंकेंची माघार
“संविधान दिन ज्यांनी साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या हेतूवरच संशय घेण्याचे पाप काही विघ्नसंतोषी लोक करत आहेत. धर्माधर्मात आणि जातीजातीमधील वातावरण बिघडवण्याचे काम अनंत गीते यांच्या माध्यमातून सुरू आहे. देशाची नेत्रदीपक प्रगती पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत आणि राज्याचा वेग मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढवत आहेत. अशावेळी बहुजनांच्या व्यापक हितासाठी सत्तेमध्ये असले पाहिजे हा विचार करत आम्ही महायुतीमध्ये एनडीएमध्ये सहभागी झालो अशी माहिती देखील सुनील तटकरे यांनी दिलीय.
महाराष्ट्रातील दोन टप्प्यात ज्या निवडणूका झाल्या आहेत. त्यात शंभर टक्के जागा महायुतीच्या पदरात पडणारच. तसेच योजनांबाबतीत मोदींनी तळागाळातील लोकांच्या मनात रुजवलेले प्रेम आहे. थेटपणाने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ६ हजार रुपये भारत सरकारचे आणि ६ हजार रुपये राज्यसरकारचे असे १२ हजार रुपये जमा होत आहेत. व्यक्तिगत महिला लाभार्थ्यांसाठी नमो नारी अभियान सुरू आहे. महिलांना ५० लाख रुपयांचे कर्ज घेताना ३५ टक्के सबसिडी दिली आहे. माझ्या ग्रामीण भागात काबाडकष्ट करणार्या शेतकऱ्यांच्या घराघरामध्ये नळाद्वारे पाणी योजना नेली. असा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला. आज प्रगतीपथावर विकासकामे होताना दिसत आहेत. असेही तटकरे म्हणाले.
दरम्यान, माझे सार्वजनिक काम ४० वर्षांचे आहे. मात्र अनंत गीते यांनी ३० वर्षातील काम दाखवावे…मंत्री पदाच्या दहा वर्षातील काम दाखवावे…गेल्या पाच वर्षात जे नैसर्गिक संकट आले त्यावेळी केलेले सहकार्य दाखवावे. या जाहीर सभेला आमदार रविंद्र पाटील, माजी आमदार आणि भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील आदींसह महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना मनसे, आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचा….“नरेंद्र मोदी शरद पवारांच्या मृत्यूची वाट पाहत नाहीत ना ? “
हेही वाचा….शिरूरमध्ये ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, आढळराव पाटील अन् कोल्हेंमध्ये प्रमुख लढत
हेही वाचा…“महाविकास आघाडीचा उमेदवार खोटारडा, मतदारांनी भूलथापांना बळी पडू नये:” धनंजय सावंत
हेही वाचा…महाराष्ट्रात अनेक अतृप्त आत्मे फिरत आहे,” नरेंद्र मोदींचा शरद पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा