पुणे : महाराष्ट्रात अनेक अतृप्त आत्मे फिरत आहेत. जे घर अस्थिर करतात. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील एका नेत्यांमुळे आज राज्य अस्थिर झाले आहे. सुमारे 45 वर्षांपूर्वी 1995 मध्ये देखील त्यांनी शिवसेना – भाजपच सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला होता. केवळ राज्य नव्हे तर आपला पक्ष देखील यांनी अस्थिर केला. त्यामुळे राज्याचे अनेक मुख्यमंत्री आपला कार्यकाळ देखील पूर्ण करू शकले नाही, अशी जहरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरदचंद्र पवार) चे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर नाव न घेता केली. त्यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मोदींना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र यांनी शरद पवार साहेबांना भटकती आत्मा असा टोमणा मारला. प्रत्येक मराठी माणसाला भटकती आत्मा या शब्दाचा अर्थ व्यवस्थित समजतो. माणसाचा मृत्यू झाल्यानंतरच आत्म्याबद्दल बोलले जाते. जीवंत माणूस आणि आत्मा याचा कधी संदर्भच लागत नाही. नेमकं मोदींना म्हणायचे तरी काय होते. बारामतीमध्ये अजित पवार यांनी जे भाषण केले होते. त्यामध्येही ते असेच म्हणाले होते की, यांचे शेवटचे भाषण कधी होणार हेच कळत नाही.
हेही वाचा…“कारखाना वाचवायचा असेल तर..,” फडणवीसांसोबत भेट झाल्यानंतर अभिजित पाटलांचं सुचक वक्तव्य
मोदीही असेच काहीसे बोलून गेले. ते पवार साहेबांच्या मृत्यूची वाट पाहत नाहीत ना ? पवार साहेब यांना एवढं घाबरायचे कारण काय ? असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड केला. तसेच संपुर्ण भाजपने आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मोदींनी शरद पवार यांना भटकती आत्मा म्हणणे, हे पटते का. याचे स्पष्टीकरण द्यावे, खाखकरून अजित पवार यांनी दिलं पाहिजे. मराठी माणसे भटकता आत्मा कशाला म्हणतात. हे मतदानातून दाखवून देतील. असाही त्यांनी इशारा दिलाय.
READ ALSO :
हेही वाचा….शिरूरमध्ये ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, आढळराव पाटील अन् कोल्हेंमध्ये प्रमुख लढत
हेही वाचा…“महाविकास आघाडीचा उमेदवार खोटारडा, मतदारांनी भूलथापांना बळी पडू नये:” धनंजय सावंत
हेही वाचा…महाराष्ट्रात अनेक अतृप्त आत्मे फिरत आहे,” नरेंद्र मोदींचा शरद पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा
हेही वाचा…नगरमध्ये मोठा उलटफेर, वंचितसह MIM , अपक्ष उमेदवार निलेश लंकेंची माघार