मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले अन् अलिकडेच शिंदे गटात प्रवेश केलेल्या रवींद्र वायकर यांना शिंदे गटाकडून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा सामना आता ठाकरे गटातील अमोल किर्तीकरांशी होणार आहे. विद्यमान खासदार असलेल्या गजानन किर्तीकर यांचा पत्ता कट करून त्यांच्या जागी रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावरून आता ठाकरे गटाच्या नेत्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केलाय.
हेही वाचा…“महाविकास आघाडीचा उमेदवार खोटारडा, मतदारांनी भूलथापांना बळी पडू नये:” धनंजय सावंत
शिवसेना फुटल्यानंतर रवींद्र वायकर यांनी सुरूवातीच्या काळात ठाकरेंची साथ दिली. मात्र त्यानंतर त्यांना जोगेश्वरी बीएमसीच्या जागेवरून ईडीची ससेमीरा पाठीमागे लागला. या प्रकरणासंदर्भात इडीकडून रवींद्र वायकर यांच्या अनेकदा चौकश्या झाल्यात. मात्र तरी देखील ते ठाकरेंसोबत राहिले. मात्र लोकसभा निवडणुकीच्या घोषणापुर्वी रवींद्र वायकरांनी देखील ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला. यातच आता त्यांना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांचा पत्ता कट करण्यात आलाय. तर त्याजागेवर महाविकास आघाडीकडून अगोदरच अमोल किर्तीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता. याठिकाणी अमोल किर्तीकर यांच्या विरोधात वडिल गजानन किर्तीकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र शिंदेंनी वायकर यांना उमेदवारी दिली आहे.
दरम्यान, वायकर साहेबांबद्दल सदिच्छाच आहे. पण कालपर्यंत निष्ठावान माणूस ईडीच्या धाकाने अक्षर:क्ष ब्लॅकमेल करून नेला. ते खरंच मनाने शिंदे गटात रमले असतील का ? असा सवाल करत रमले तरी अमोल किर्तीकरांशी लढताना गजानन किर्तीकर वायकरांची साथ देतील की पोटच्या पोराची असा खोचक सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा….“अजितदादा विकासकामे खेचून आणतील, त्यासाठी सुनेत्रा पवारांना खासदार करा”
हेही वाचा…“उध्दव ठाकरे, अन् अनंत गीते यांनी सीएए कायदा काय आहे ? हे जनतेला सांगावे”, तटकरेंनी डिवचलं
हेही वाचा…“लोकसभेची निवडणुक ही तटकरे विरुद्ध गीते एवढी सिमीत नाही तर..” तटकरेंचा हल्लाबोल
हेही वाचा….“नरेंद्र मोदी शरद पवारांच्या मृत्यूची वाट पाहत नाहीत ना ? “
हेही वाचा….शिरूरमध्ये ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, आढळराव पाटील अन् कोल्हेंमध्ये प्रमुख लढत