पुणे : पुणे जिल्ह्यातील बारामती, पुणे, मावळ, शिरुर लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेतली आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. मोदींनी पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केला. मोदींनी शरद पवारांचे नाव न घेता ही टीका केली. मात्र त्यांचा रोख शरद पवारांकडेच होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मोदींच्या ‘अतृप्त आत्मा’ या टीकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा….“नरेंद्र मोदी शरद पवारांच्या मृत्यूची वाट पाहत नाहीत ना ? “
“पंतप्रधान नेमकं कोणाबद्दल बोलले ते माहिती असायला मी काही ज्योतिषी नाही. त्यांच्या मनात नक्की कोण ते… त्याबाबतीत मी पुढच्या सभेत मोदींना विचारेन… आमची पुढची प्रचारसभा जिथे असेल आणि तिथे मीदेखील असेन तर मी तेव्हा मोदींना त्या वक्तव्याबाबत विचारेन… भटकत्या आत्म्याचं नाव काय ते देखील विचारेन. त्यांनी नेमका कोणत्या उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे वक्तव्य केलं त्याबाबतही विचारेन. त्यांनी मला नाव सांगितलं की मी ते तुम्हाला सांगेन”, असं अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.
हेही वाचा….शिरूरमध्ये ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, आढळराव पाटील अन् कोल्हेंमध्ये प्रमुख लढत
दरम्यान, नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर केलेल्या टीकेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शरद पवार गटाकडून मोदींवर आगपाखड करण्यात येत आहे. “महाराष्ट्र हे आमचं शरीर म्हणजेच पंढरी आहे आणि विठ्ठल हा या पंढरीतला आत्मा आहे. म्हणूनच स्वतःचं आसन अस्थिर झाल्याचं लक्षात येताच मोदींना महाराष्ट्राची आठवण झाली, पण इथे येऊन त्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेण्याऐवजी त्यांना अस्थिर आत्मे दिसू लागले आहेत”, असं शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवार महाराष्ट्राचा आत्मा, हे मोदीला ४ जुनला कळून येईल,” शरद पवार गटाचा मोदींवर पलटवार
हेही वाचा…“अमोल किर्तीकरांशी लढताना ‘गजानन किर्तीकर’ वायकरांची साथ देतील की पोटच्या पोराची ?
हेही वाचा….“अजितदादा विकासकामे खेचून आणतील, त्यासाठी सुनेत्रा पवारांना खासदार करा”
हेही वाचा…“उध्दव ठाकरे, अन् अनंत गीते यांनी सीएए कायदा काय आहे ? हे जनतेला सांगावे”, तटकरेंनी डिवचलं
हेही वाचा…“लोकसभेची निवडणुक ही तटकरे विरुद्ध गीते एवढी सिमीत नाही तर..” तटकरेंचा हल्लाबोल