मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य आता मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप बघायला मिळत आहेत यातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या ठाकरे शैलीत राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या वरती घणाघात केला यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडवणीस यांचा टरबूज म्हणून उल्लेख केला यातच कलंक फडतूस असे शब्द वापरून ही उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडवणीस यांना दिवस ला आहे त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलाय.
हेही वाचा…“आढळरावांच्या भव्य रॅलीला हडपसरमधील हजारो नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद”
देशात सगळेच प्रश्न संपले असून महाराष्ट्रात शिवसेना हाच एक दुश्मन आहे. अरे त्या टरबुजाचं काय करायचं ? हे तुम्हाला माहिती आहे. अरे टरबूज असतं तर उन्हाळ्यात कामी तरी आला असतं. परंतु हे दुष्काळ 13 वा महिना आहे, ते टरबूज नाही आहेत. ते दिवाळीतील चिराड आहेत. आधी ते टरबूज होते. आता पाव उपमुख्यमंत्री झालेत. मध्यंतरी त्यांना मी कलंक बोललो होतो. पण आता बोलत नाही. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टिका केली.
हेही वाचा….“सत्ता एकदा डोक्यात शिरली, की ती..,” शरद पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टिकेवर देवेंद्र फडणवीस यांनी जोरादर प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची निराशा, हताशा झाली आहे. तसेच त्यांच्याकडे मुद्दे राहिलेले नाहीत. त्यामुळे ते अशा पद्धतीने बोलत आहेत. मी तर नागपुरचा आहे. नागपुरीच्या शैलीत मला त्यांच्यापेक्षा खाली जाऊन बोलता येतं. पण मला ते शोभत नाही. कारण जे मॅच्युअर्ड राजकारणी असतात. त्यांनी असं बोलायचं नसतं. मला असं वाटतं की समोर हार दिसते आहे. निराशा वाढते आणि त्यांना शिवराय भाषा सुरू झालेली आहे. ही शिवराय भाषा वापरली तरी जनता त्यांना मतदान करणार नाही. जनता त्यांच्याजवळ जाणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलाय.
READ ALSO :
हेही वाचा..“सुनेत्रा पवारांचा पायगुण चांगला, आताच तर इतकं, तर खासदार झाल्यात तर काय होईल विचार करा,”
हेही वाचा…“आढळरावांनी वाडा गावच्या विकासासाठी विविध प्रकारचा निधी पोहोचवला”