पुणे : कोरोनारुग्णांची संख्या कमी झाल्याने राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत. मात्र, महामारीचा धोका अद्याप टळलेला नाही. अनेकजण मास्क देखील लावताना दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी जे मास्क लावणार नाहीत, त्यांना तिकीट दिले जाणार नाही, अशा शब्दात कार्यकर्त्यांना सुनावले आहे.
कोविड संपलेला नाही, आता सगळं सुरु झालंय. दादांनी परवानगी दिलीये, चला आता काढा गाडी आणि फिरा असं करु नका. आता जो मास्क घालणार नाही त्याला तिकीट देणार नाही. दादांचं सगळं ऐकता मग हे का ऐकत नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
आता जो मास्क घालणार नाही त्याला तिकीट देणार नाही. जो विनामास्कचा दिसेल त्याचं तिकीट कट होईल. विनामास्कचे फोटो आले की त्याचही तिकीट कट केलं जाईल. याबाबत मी दादाला आयडिया देते, असे ते म्हणाल्या.
उपमुख्यंत्री अजित पवारांचे उदाहरण देत, दादा एक सेकंदही मास्क काढत नाहीत. सव्वा वर्षात किती जणांनी दादाचा चेहरा बघितलाय ?, याची आठवण त्यांनी करून दिली. यावेळी बोलताना त्यांनी खासदार निधी कट केल्याने केंद्र सरकारवर देखील निशाणा साधला.
Read Also :
- ‘पाच पिढ्यांची शरद पवारांनी माती केली, आता पुढच्या पिढ्यांची रोहित पवारांमुळे माती होईल’
- नाना पटोले राहुल गांधींना देणार ‘बर्थ डे गिफ्ट’, भाजप नेते काँग्रेसच्या वाटेवर ?
- मराठा आरक्षण : प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढण्याचे निर्देश; समन्वयासाठी समितीही नेमा – उद्धव ठाकरे
- ‘राज्य सरकार मागण्यांबाबत सकारात्मक, मात्र अद्याप आंदोलन स्थगित झालेलं नाही’
- ‘मनसुख हिरेन आणि सचिन वाझे प्रकरणी अटक झालेल्या सगळ्यांचे ‘गॉडफादर’ उद्धव ठाकरे?’