अहमदनगर : गेल्या पाच पिढ्यांची शरद पवारांनी माती केली. आता पुढच्या पाच पिढ्यांची रोहित पवारांमुळे माती होईल, अशा शब्दात भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर बोचरी टीका केली आहे.
श्रीगोंदा, कर्जतला हक्काचं पाणी मिळवून देण्यात अपयश आलेले रोहित पवार हे कामात कधीकधी तर क्षेय घेण्यात मात्र सर्वात आधी असतात. आपणच मुख्यमंत्री असल्याप्रमाणे रोहित पवार केंद्र सरकारवर बोलतात. पण आपल्याच मतदारसंघातील प्रश्न सोडवण्याकडे त्यांचं लक्ष नसतं, असा टोला पडळकरांनी रोहित पवारांना लगावला आहे.
रोहित पवार हे शरद पवार यांचं सुधारित व्हर्जन आहे. गेल्या पाच पिढ्यांची शरद पवारांनी माती केली. आता पुढच्या पाच पिढ्यांची रोहित पवारांमुळे माती होईल, असे म्हणतानाच त्यांनी महाविकास आघाडीवर देखील निशाणा साधला. महाविकास आघाडीमध्ये सगळा सावळा गोंधळ सुरु असल्याचे ते म्हणाले.
बारातमी अॅग्रोच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेल्या कोंबड्यांच्या खाद्याने मोठं नुकसान झाल्याची तक्रार एका तरुणाने आपल्याकडे केली असल्याचे पडळकर म्हणाले.
Read Also :
- नाना पटोले राहुल गांधींना देणार ‘बर्थ डे गिफ्ट’, भाजप नेते काँग्रेसच्या वाटेवर ?
- मराठा आरक्षण : प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढण्याचे निर्देश; समन्वयासाठी समितीही नेमा – उद्धव ठाकरे
- ‘राज्य सरकार मागण्यांबाबत सकारात्मक, मात्र अद्याप आंदोलन स्थगित झालेलं नाही’
- ‘मनसुख हिरेन आणि सचिन वाझे प्रकरणी अटक झालेल्या सगळ्यांचे ‘गॉडफादर’ उद्धव ठाकरे?’
- एनआयए कडून एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना अटक, आजच सेशन कोर्टात हजर करणार