मुंबई : काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामानातून, तसेच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील, शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीचा उच्चार केला होता. तसेच, संजय राऊत यांच्या या विधानावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रश्न विचारला असता, त्यांनी देखील राऊतांच्या सुरात सूर मिसळला, यांनतर राज्यात काँग्रेसला बाजूला सारून राष्ट्रवादी-शिवसेना अशी नवीन आघाडी पुढे येणार, या चर्चांना उधाण आले आहे.
हे पण वाचा, ओबीसींचा इम्पिरिकल डेटा तयार केल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही; पकजा मुंडे म्हणतात…
दरम्यान, यानंतर आता काँग्रेसकडून यावर पहिली प्रतिक्रिया देण्यात आली असून, काँग्रेसचे महत्वाचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी, “भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, आम्ही महाविकास आघाडीत एकत्र आहोत आणि जनतेसाठी मिळून काम करतो, हे उद्दिष्ट समोर ठेवून पुढेही काम करू,” अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
हे पण वाचा, ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार- विजय वडेट्टीवार
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी काल बैठक घेतली. मात्र, यावेळी आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने स्वबळावर निवडणूक लढण्याबाबत काहीही चर्चा झाली नाही. राज्याच्या विधानसभा निवडणुकीला अजून साडे तीन वर्षे बाकी आहेत. सध्या तरी पक्षबांधणीला महत्व देण्यात आले असून, जिथे काँग्रेसचे पालकमंत्री आहेत, संपर्क मंत्री आहेत, तिथे त्यांनी फिरलं पाहिजे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, आपल्या पक्षाला विजय मिळवून देण्याच्या दृष्टीने त्यांनी आपलं लक्ष केंद्रित करावं,’ अशा सूचना यावेळी दिल्याचं, त्यांनी स्पष्ट केलं.
हे पण वाचा, ओबीसी आरक्षणासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजपा, एकत्र येणार?
यावेळी, ‘आघाडी सरकार तीन पक्षांचं आहे. आमच्यात अंतर्गत जे काही प्रश्न निर्माण झाले आहेत, त्यातून आम्ही मार्ग काढत आहोत, काही प्रश्न सुटलेले दिसत आहेत. पदोन्नती संदर्भातील आरक्षण देण्याच्या बाबतीतलं प्रकरण न्यायलयात आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयांनंतर, त्यानुसार कारवाई होणार आहे. मात्र, गरीब घटकाला न्याय मिळाला पाहिजे , हा हेतू समोर ठेऊनच सरकार आलं आहे,’ अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Read Also :
- नाना पटोले राहुल गांधींना देणार ‘बर्थ डे गिफ्ट’, भाजप नेते काँग्रेसच्या वाटेवर ?
- ‘पाच पिढ्यांची शरद पवारांनी माती केली, आता पुढच्या पिढ्यांची रोहित पवारांमुळे माती होईल’
- विनामास्कचा दिसेल त्याचं तिकीट कट होणार – सुप्रिया सुळे
- ‘तुम्हाला भंडाऱ्यात बसवण्याची व्यवस्था करू’, दरेकरांचे राऊतांना जोरदार प्रत्युत्तर
- अजित पवारांनी केली बीड जिल्ह्याच्या मुख्याधिकाऱ्यांची खरडपट्टी, म्हणाले…