मंचर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेतला. यानंतर देशातील एव्हाना राज्यातील विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्यावर आता शिरूर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी सरकारवर जोरदार टिका केली होती. त्यावर आता महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जोरदार पलटवार केला आहे.
हेही वाचा…“शहरी पूर नियंत्रण आराखडा राबविणार”, मुरलीधर मोहोळांनी पुणेकरांना दिलं आश्वासन
सरकारने आता कांद्याची निर्यातबंदी उठवली. त्यामुळे तीन महिन्यांपासून कांदा, कांदा ओरड करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हेंचा हा मुद्दाच सरकारने हिरावून घेतल्याने कोल्हेंना पोटशूळ उठला आहे. त्यामुळे ते सैरभैर होऊन, देशाच्या संरक्षण खात्याच्या गुप्ततेविषयी पोरकट भाष्य करू लागले आहेत, असा पलटवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंवर केला आहे.
ओतूर येथील सभेत, कंपनीच्या व्यावसायिक फायद्यासाठी आढळरावांनी संसदेत संरक्षण खात्याविषयी ७५ प्रश्न विचारल्याचा आरोप डॉ. कोल्हे यांनी केला होता. त्यावर आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंना चौफेर झोडपले. ते म्हणाले की, मी माझ्या कंपनीच्या व्यवसायासंबंधीचा विचारलेला एकही प्रश्न त्यांनी दाखवावा, अन्यथा जाहीर माफी मागून कोल्हेंनी निवडणूक रिंगणातून बाहेर पडावे, या शब्दांत त्यांनी कोल्हेंना ठणकावले.
तसेच माझी कंपनी सॉफ्टवेअरची नसून हार्डवेअरची आहे. मुळात पाच वर्षे गायब राहून निवडणूक आल्यावर कांदा प्रश्नावर कोल्हेंनी फक्त ओरड केली, पण त्यासाठी काय केलं, सरकारकडे पाठपुरावा केला का? असा सवाल उपस्थित करत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कोल्हेंवर जोरदार घणाघात केला.
READ ALSO :
हेही वाचा…“कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला किती जागा मिळणार” ? शरद पवारांनी थेट आकडाच सांगितला
हेही वाचा…“निकालावेळी अनंत गीते तिसऱ्या राउंडला बाहेर जाताना दिसले पाहिजे”, तटकरेंनी पुन्हा डिवचलं
हेही वाचा…पुण्यात ‘एमआयएम’ शक्तीप्रदर्शन करणार, कुणाला बसणार फटका ?
हेही वाचा…“मला घड्याळ्यापेक्षा तुतारी जास्त आवडली, तुतारी तु तू करत वाजली की अख्खा महाराष्ट्र गरजतो”