मुंबई: काँग्रेसकडून काल इंधनवाढीविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले होते. यामध्ये सर्वात चर्चेला विषय ठरला तो म्हणजे मुंबईमध्ये मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह अनेक नेते दरवाढी विरोधात आंदोलन करत असताना बैलगाडी मोडून सर्व नेते खाली पडल्याने दिवसभर भाजपा नेत्यांने या आंदोलनाची खिल्ली उडलली. मात्र अखेरीस भाई जगताप यांनी भाजपाच्या नेत्यांना खरमरीत शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.
हे पण वाचा: तौक्ते आणि यूपीएससीवरून, भाई जगताप आणि गोपीचंद पडळकर यांच्यात शाब्दिक चकमक
मुंबई प्रदेश काँग्रेसच्या आंदोलनात बैलगाडी मोडल्याने हसणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना भाई जगताप यांनी ट्विटरवरून खडेबोल सुनावले. या ट्विटमध्ये भाई जगताप म्हणतात की, माझ्या पडण्याच्या व्हिडिओसाठी उत्सुक असलेले भाजपाचे सर्व नेते जर देशाची अर्थव्यवस्था, शिक्षण, आरोग्यसेवा यासाठी तितकेच उत्सुक असते, तर आज देशाची अशी स्थिती झाली नसती, असा टोला भाई जगताप यांनी लगावला आहे.
हे पण वाचा: भाई जगताप यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते बैलगाडीतून कोसळले; आंदोलनातच घडला प्रकार!
माझ्या पडण्याच्या व्हिडिओसाठी इतके उत्सुक असलेले सर्व भाजप नेते,
जर ते देशाची अर्थव्यवस्था, शिक्षण, आरोग्य सेवेसाठी तितकेच उत्सुक अस्ते तर!
आज देशाची स्थिती अशी झाली नसती….— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) July 10, 2021
दरम्यान, इंधन दरवाढीविरोधात आज मुंबई काँग्रेसचं आंदोलन सुरू होतं. मोदी सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. वाढत्या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि अन्य नेते बैलगाडीवरून आंदोलनात सहभागी झाले होते. बैलगाडीवर जास्त नेते झाल्यानं ती कोसळली आणि भाई जगताप यांच्यासह सगळे नेते खाली कोसळले.
हे पण वाचा: भाई जगतापांनी बोलून दाखवली खंत, या आघाडीत काँग्रेस ‘तिसराच’
या घटनेच्या व्हिडीओवरून राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला होता. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुम्ही काँग्रेसच्या आंदोलनाचा व्हिडीओ लक्षपूर्वक ऐकला तर लक्षात येईल की, आंदोलनादरम्यान, नेते देश का नेता कैसा हो राहुल गांधी जैसा हो, अशा घोषणा देत होते. कदाचित राहुल गांधींना राष्ट्रीय नेता म्हटलेलं बैलांनाही आवडलेलं नसावं, त्यामुळे ती बैलगाडी मोडली, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीसांनी त्या व्हिडिओवरून काँग्रेसला लगावला होता.
तर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला होता. तोल सांभाळा भाई जगताप. महाराष्ट्रात अभद्र आघाडी करताना राजकीय तोल गेलाच आहे. तुमचे ओझे पेलताना दोन बैलांनी अंग काढून घेतल्यावर आता सगळे काँग्रेसी कोसळलात तसे राज्याच्या राजकारणातही होईल. गाडीला कोणते दोन बैल जोडावे याचा आधीच विचार करा, असे ट्विट केशव उपाध्ये यांनी केले होते