मुंबई : महामारीमुळे देश संकटात सापडला असून, परिस्थिती बिकट झाली आहे. देशात महामारीच्या वेगाने झालेल्या फैलावाचा परिणाम शिक्षण क्षेत्रावर देखील झाला असून, त्या अनुषंगाने राज्यात विविध बोर्डांनी शाळा आणि महाविद्यालयाच्या परीक्षाही रद्द केल्या आहेत. यातच आता, केंद्रीय लोकसेवा आयोगाने युपीएससीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर पुण्यात, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विद्यार्थ्यांसोबत जोरदार आंदोलन केलं होतं. या संदर्भाने, महामारीच्या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून घेण्यात आलेल्या यूपीएससी परीक्षांबाबतच्या या निर्णयावरून, काँग्रेस नेते आणि आमदार भाई जगताप यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांवर ट्विटरवरून एक ट्विट करत टीका केली आहे.
“राज्य सरकारने MPSC ची परीक्षा रद्द केली म्हणून रस्त्यावर लोळण घेऊन आंदोलन करणारे… केंद्र सरकारने UPSC ची परीक्षा रद्द केल्यावर आता हे महाराष्ट्र द्रोही कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत?? आता दातखिळी बसली आहे का?? #महाराष्ट्रद्रोही”, अशा शब्दात त्यांनी पडळकर यांच्यावर निशाणा साधला होता.
राज्य सरकारने MPSC ची परीक्षा रद्द केली म्हणून रस्त्यावर लोळण घेऊन आंदोलन करणारे…
केंद्र सरकारने UPSC ची परीक्षा रद्द केल्यावर आता हे महाराष्ट्र द्रोही कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत??
आता दातखिळी बसली आहे का??#महाराष्ट्रद्रोही
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) May 17, 2021
भाई जगतापांच्या या टीकेचा आता पडळकरांनी देखील समाचार घेतला असून, “नाव बदलल्याने जसे ‘#भाई’ होता येत नाही तसेच माझ्या महाराष्ट्राच्या बांधवांच्या वेदना समजता येत नाही… काल चक्री वादळात तुंबलेली मुंबई थांबली, पडली, झडली, खचली, तेव्हा आपण विरोधी पक्ष म्हणून कोणत्या बिळात लोळत होता की हप्ता वसूली करत होता? #वसूली_सरकार #MPSC #BJPMaharshtra”, असा हल्लबोल त्यांनी जगतापांवर केला आहे.
नाव बदलल्याने जसे ‘#भाई’ होता येत नाही तसेच माझ्या महाराष्ट्राच्या बांधवांच्या वेदना समजता येत नाही…
काल चक्री वादळात तुंबलेली मुंबई थांबली, पडली, झडली, खचली, तेव्हा आपण विरोधी पक्ष म्हणून कोणत्या बिळात लोळत होता की हप्ता वसूली करत होता?#वसूली_सरकार#MPSC#BJPMaharshtra— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) May 18, 2021
Read Also :
- “भारताच्या भविष्यासाठी मोदी सिस्टिमला झोपेतून उठवणे गरजेचं”
- “नुसता फोन फिरवला तरी शंभर वेळा हजर होईन” म्हणणारे प्रताप सरनाईक गायब!
- “कोणत्याही परिस्थिती मध्ये गुजरातला पाणी जाऊ देणार नाही” छगन भुजबळ म्हणाले
- ‘एकाच पावसात कटली “मुंबई पॅटर्न”ची पतंग, सगळीकडे थुकपट्टी करून चालत नाही’
- केंद्राच्या खात भाव वाढीच्या निषेधार्थ राज्यात होणार, “टाळी-थाळी बजाव” आंदोलन