मुंबई : मोदी सरकारने घेतलेल्या खतवाढीच्या निर्णयाला देशभरातून विरोध होत असून, राज्यातल्या शेतकरी वर्गाने देखील केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. तसेच, या निर्णयामुळे भाजप सरकारच्या विरोधात जनतेचा आक्रोश वाढत चालला आहे.
यातच, आता प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी, राज्यतल्या शेतकऱ्यांना, तसेच केंद्राच्या या निर्णयाचा विरोध करणाऱ्या नागरिकांना राज्यव्यापी “टाळी-थाळी बजाव” आंदोलनाची हाक दिली असून, येत्या गुरुवारी (२० मे २०२१) सायंकाळी ६ वाजता, ५ जणांनी गावातील चौकात सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून, हे आंदोलन छेडण्याचे त्यांनी आव्हान केले आहे.
केंद्र सरकारच्या खात भाव वाढीच्या निषेधार्थ होणाऱ्या या आंदोलनात, त्यांनी केंद्राकडे. “तूर, मूग, उडीद या कडधान्यांची केंद्र सरकडून सुरु असलेली आयात त्वरित थांबवण्यात यावी. तसेच, रासायनिक खतांचे वाढलेले भाव तातडीने कमी करावे”, या मागण्या केल्या असून, त्या मान्य न झाल्यास अजून तीव्र स्वरूपात आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
Read Also :
- ‘फडणवीसांनी राज्यभर वणवण फिरण्यापेक्षा आणि पत्र लिहिण्यापेक्षा नागपुरातचं बसावं’
- ‘मी गोमूत्र पिते, त्यामुळे मला कोरोना झाला नाही’
- ‘कोव्हॅक्सिन’चा प्रकल्प विदर्भातून पुण्याला पळवला ? अजित पवार म्हणाले…
- ‘म्युकरमायकोसीस’ रुग्णांच्या औषधोपचारासाठी ३० कोटींचा निधी उपलब्ध, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
- कुस्तीपटूच्या मृत्यू प्रकरणी ऑलिम्पकविजेता सुशील कुमार फरार, एक लाख रुपयांचे इनाम जाहीर