मुंबई : कोरोनारुग्णांना ‘म्युकरमायकोसीस’ आजाराने ग्रासले जात असल्याचे समोर आले होते. राज्यात या आजाराची लागण झाल्याचे अनेक रुग्ण आढळले होते. सरकारने या रुग्णांवर मोफत उपचार करणार असल्याची घोषणा केली होती. याच पार्श्वभूमीवर माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या आजाराच्या रुग्णांच्या औषधोपचारासाठी ३० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती दिली आहे.
‘म्युकरमायकोसीस’चा अंतर्भाव महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत करण्यात आला असून त्यासाठी आवश्यक 30 कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. त्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात राज्यातील कोरोना परिस्थितीसह प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिकचा धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिल्याने राज्यातील लहान मुलांच्या सुरक्षेसाठी, उपचारांसाठी सक्षम स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात यावी. रेमडीसिवीरच्या पुरेशा पुरवठ्यासह ऑक्सिजनच्या अखंडित उपलब्धतेसाठी सूक्ष्म नियोजन करावे. राज्यात उभारण्यात येणाऱ्या नवीन ऑक्सिजन प्रकल्पांचे काम वेगाने पूर्ण करण्याबरोबरच ऑक्सिजन वापराचे ऑडिट करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
अजित पवार म्हणाले की, राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने उपाययोजनांसाठी तातडीने पावले उचलावीत. या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा अधिकचा धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे लहान मुलांच्या सुरक्षेसाठी, उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारावी. यामध्ये लहान मुलांचे व्हेंटिलेटर तसेच त्यांच्यासाठी लागणारी औषधे, इतर उपचारांसाठीची सामुग्री उपलब्ध करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
Read Also :
- कुस्तीपटूच्या मृत्यू प्रकरणी ऑलिम्पकविजेता सुशील कुमार फरार, एक लाख रुपयांचे इनाम जाहीर
- ‘या माणसाचा कचरा करायला शब्दच नाहीत’
- ‘तौक्ते हे राष्ट्रीय वादळ आहे, त्याने महाराष्ट्राचा नाद करू नये’
- ‘एकाचे लक्ष मुंबईवर तर दुसऱ्याचे बारामतीवर, उर्वरित राज्य वाऱ्यावर’
- काँग्रेसची आग्रही मागणी, तातडीने नुकसानीचे पंचनामे करा