मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे, पालघरला तडाखा दिला. चक्रीवादळामुळे राज्यात नऊ जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे आठ हजार घरांचे नुकसान झाले. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी ‘तौक्ते वादळ राष्ट्रीय वादळ आहे, त्याने महाराष्ट्राचा नाद करू नये’, असे अजबविधान केले होते. यावरून आता भाजप नेते निलेश राणे यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
याला काय म्हणणार??? या माणसाचा कचरा करायला शब्दच नाहीत. हवामान खात्यातील कर्मचारी हे वाचून ढसाढसा रडून मरतील. ते म्हणतील उगाच खर्च करून अभ्यास केला, डिग्री मिळवली… आकाशाला खुन्नस देत मिटकरी उभा आहे ना थर्माकोलची तलवार घेऊन, असा जोरदार खोचक टोला निलेश राणेंनी मिटकरींना लगावला आहे.
तौक्ते वादळ राष्ट्रीय वादळ आहे. त्याने महाराष्ट्राचा नाद करू नये. राष्ट्रीय स्तरावरील वादळ असल्यामुळे याची चिंता दिल्लीश्वरांनी करावी. छ. शिवरायांचे राज्य असे अनेक वादळ परतून लावतो.ती हिम्मत दिल्लीश्वर व इथल्या 106 शिपायांमध्ये नाही.#सुरीले तौक्ते वादळ. pic.twitter.com/Cs1Zimv36R
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 17, 2021
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मिटकरी यांनी हे राष्ट्रीय वादळ असून, त्याने महाराष्ट्राचा नाद करू नये, असे अजब ट्विट केले होते. तौक्ते वादळ राष्ट्रीय वादळ आहे. त्याने महाराष्ट्राचा नाद करू नये. राष्ट्रीय स्तरावरील वादळ असल्यामुळे याची चिंता दिल्लीश्वरांनी करावी. छ. शिवरायांचे राज्य असे अनेक वादळ परतून लावतो.ती हिम्मत दिल्लीश्वर व इथल्या 106 शिपायांमध्ये नाही, असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला होता. त्यांचे हे ट्विट व्हायरल होत आहे.
दरम्यान, दरम्यान, तौक्ते चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकलं आहे. चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी भागांचे मोठे नुकसान झाले आहे.
Read Also :
- ‘तौक्ते हे राष्ट्रीय वादळ आहे, त्याने महाराष्ट्राचा नाद करू नये’
- ‘एकाचे लक्ष मुंबईवर तर दुसऱ्याचे बारामतीवर, उर्वरित राज्य वाऱ्यावर’
- काँग्रेसची आग्रही मागणी, तातडीने नुकसानीचे पंचनामे करा
- लवकरच आणखीन एक वादळ? गृहमंत्र्यांची परवानगी न घेता राज्याचे महासंचालक चंदीगडला!
- ‘घरी राहून काम खूप झाले, आता मंत्रालयातून काम कधी करणार?’