मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबई सोबतच आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला असून, कोकण किनारपट्टीसह कित्येक ठिकाणी वित्तहानी झाली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालीन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षाची भेट घेऊन, राज्यातील वादळाच्या परिस्थितीचा आणि बचाव व मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला आहे. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विट्स करून टीका केली आहे.
“मुख्यमंत्री हे मंत्रालयातून काम कधी करणार? कोकण, मुंबईवर वादळ आले, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, घरेपडली, झाडेकोसळली, रस्त्यांवर पाणी… त्यातच कोरोनाचे संकट, मुख्यमंत्री घरात बसलेत. उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात आपत्ती निवारण कक्षात भेट देऊन पहाणी तरी केली, पण मुख्यमंत्री कधी दिलासा देणार?”, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री @OfficeofUT हे Work From Mantryalay कधीकरणार? कोकण, मुंबईवर वादळ आले, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, घरेपडली, झाडेकोसळली, रस्त्यांवर पाणी… त्यातच कोरोनाचे संकट,मुख्यमंत्री घरात बसलेत. @AjitPawarSpeaks यांनीमंत्रालयात आपत्तीनिवारण कक्षात भेटदेऊन पहाणी तरी केली पण..2
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 17, 2021
तसेच, “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना गिरगावला मांडवाला आग लागण्याचा घटना अथवा पावसाने मुंबईला झोडपण्याची घटना असो तेव्हा परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत तेथून हालले नव्हते. इथे लोकांना घरून काम करा करा सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी स्वःताच इतक मनावर घेतलं आहे की राज्यात त्यांच्यासाठी मंत्रालयसुध्दा आहे हे कधी लक्षात येणार?”, अशी खोचक टीका त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.
मनावर घेतलं आहे की राज्यात त्यांच्यासाठी मंत्रालयसुध्दा आहे हे कधी लक्षात येणार?
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 17, 2021
“महाराष्ट्रात एका होम मिनिस्टरने जनतेचा विश्वास कधीच धुळीस मिटविला. मुख्यमंत्री तर ‘वर्क फ्रॉम होम मिनिस्टर’ झाले आहेत. जनता संकटाशी मुकाबला करत असताना वर्क फ्रॉम होम मिनिस्टरने किमान ‘वर्क फ्रॉम मंत्रालय’ तरी करून दाखवावे.” असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात एका होम मिनिस्टरने जनतेचा विश्वास कधीच धुळीस मिटविला. मुख्यमंत्री तर 'वर्क फ्रॉम होम मिनिस्टर' झाले आहेत. जनता संकटाशी मुकाबला करत असताना वर्क फ्रॉम होम मिनिस्टरने किमान 'वर्क फ्रॉम मंत्रालय' तरी करून दाखवावे.
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 17, 2021
Read Also :
- “आता काहीही बोलण्यासारखं राहिलं नाहीये” म्हणत, केंद्रीय समितीतील वैद्याने दिला राजीनामा
- आंदोलन थांबलं नाही! थांबणार नाही! मराठा आंदोलनात भाजप होणार सहभागी
- “…तर उजनीसाठी रक्तही सांडू”, शिवसेना आमदाराची शिवगर्जना
- “पुन्हा एकदा तोडले का अकलेचे तारे”; उमा खापरेंची, रुपाली चाकणकरांवर टीका
- “रेमेडीसीवर घोटाळ्यात अडकलेत मोठे मासे…”; फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना पत्र