मुंबई : देशात सध्या महामारीने सगळ्यानांच चांगले फैलावर घेतले आहे. दुसऱ्या लाटेमध्ये बाधित रुग्णांचे प्रमाण वाढत आहे, मृत्यूदरही वाढत आहे. आरोग्य सोयी-सुविधांचा देशभर तुटवडा आहे. यातून प्रत्येक राज्य मार्ग काढत आहे.
दरम्यान, अनेक राज्यांमध्ये जीवनावश्यक आरोग्य सुविधांची, तसेच रेमेडिसिविर इंजेक्शन्स आणि इतर औषधांची बेकायदेशीर साठेबाजीची सुरु असून, काळाबाजार सुरु असल्याची देखील प्रकरणे समोर आली आहेत.
यातच राज्यात मध्ये रेमडेसीविरचा काळा बाजार करणाऱ्या आरोपींना अटक झाल्यानंतर, त्यांची पोलीस कोठडी न मागणे आणि या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई न करणे अक्षम्य असून, त्यांच्यावर कठोर कारवाईचा बडगा उगारला पाहिजे अशी मागणी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच, याप्रकरणी त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना देखील पत्र लिहिले आहे.
तसेच, या रेमडेसीविर घोटाळ्यात राज्यातले मोठे मासे अडकले असून, त्यांना अभय देण्याकरता मोघम कारवाई केली जात असून, अमरावतीच्या रेमडेसीविर घोटाळ्यातील खरा सचिन वाझे कोण, याचा तपास लागावा, अशी इथल्या जनतेची भावना आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
Read Also :
- “देशात व्हेंटीलेटर्स आणि मोदी दोन्हीही बिनकामाचे”
- “भाजपविरोधात संपूर्ण देश एकजूट, आम्हीही पाहून घेऊ किती लोकांना अटक करताय”
- घरात नाही दाणा पण, मला “वॅक्सिन गुरू” म्हणा…
- “साहेब काहीतरी करा, नाहीतर २०२४ मध्ये आपला पक्ष…”; कट्टर भाजप समर्थकाची ऑडिओ क्लिप व्हायरल
- “…म्हणून आपण मनोरुग्ण झाले आहात, सांभाळा स्वतःला”, सातपुतेंचा शाब्दिक हल्लाबोल