मुंबई : समाज माध्यमांवर सध्या महाराष्ट्रातल्या एका कट्टर भाजप समर्थकाची ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल होत असून, मोदी सरकारने घेतलेल्या खतवाढीच्या निर्णयाने शेतकरी नाराज झाला असून, कसा त्रस्त आहे आणि ही बाब भाजपच्या विविध नेत्यांना सांगितली असून, लवकर काहीतरी करा, अन्यथा २०२४ मध्ये पक्षाला पराभवाची चव चाखावी लागेल”, अशी भीती या ज्येष्ठ कार्यकर्त्याने व्यक्त केली आहे.
या संवादात पेरेजपूरचे (ता. साक्री) सरपंच, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि इंजिनिअर मनोज देसले भाजपचे माजी मंत्री बोंडे यांना तळमळीने शेतकऱ्याचे गाऱ्हाणे सांगताना म्हणत आहेत, “११०० रुपयांची खताची गोणी एकदम १९०० रुपये झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे, असे मोठे निर्णय घेताना पक्षाने कार्यकर्ते आणि लोकांशीही बोलायला पाहिजे. साहेब तुम्ही काही तरी, लोक भाजपला लई नावं ठेवताहेत”, अशी हळहळ त्यांनी व्यक्त केली आहे.
मी स्वतः कट्टर भाजप समर्थक आहे, कार्यकर्ता आहे. बागायतदार शेतकरी असून, माझीही ८५ एकर शेती आहे. सरकारच्या या निर्णयामुळे भाजप सरकारच्या विरोधात जनतेचा आक्रोश वाढणार आहे. याचा परिणाम येत्या २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत दिसतील. त्यामुळे शेतकऱ्याला ध्वस्त करणारा हा निर्णय केंद्राने तात्काळ रद्दबादल करावा. याबाबत मी अनेक नेत्यांशी बोललो मात्र त्यांनी असमर्थता दर्शवत तुमच्याशी संपर्क करायला सांगितले. त्यामुळे मी आपल्याशी संवाद साधला”, असे देसले यांनी सांगितले.
तसेच, “मी पंतप्रधान मोदींचा चाहता आहे. मला अजून किमान १५ वर्ष या देशाचे पंतप्रधानपदी मोदीजी असावे असे वाटते, परंतु या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांप्रती असे निर्णय घेतल्यास पक्षाला आणि मोदींना येणारे दिवस कठीण जातील. याबाबत आपण वरिष्ठांशी बोलून यावर निर्णय घ्यावा, असे त्यांनी सांगितले यावर माजी कृषिमंत्री बोंडे फक्त हो, हो, वरिष्ठांशी बोलतो इतकेच म्हणत असल्याची ऐकू येत आहे.
Read Also :
- मराठी कलाकारांची उपासमार; देंवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आमदार महेश लांडगे सरसावले
- ‘दादा’ आमचे हक्क म्हणजे काय सापशिडीचा खेळ वाटतोय काय?
- “…म्हणून आपण मनोरुग्ण झाले आहात, सांभाळा स्वतःला”, सातपुतेंचा शाब्दिक हल्लाबोल
- देशात रुग्णसंख्या तीन लाखांच्या खाली, मृतांची संख्या चिंता वाढवणारी
- देश सोडून पळाल्याच्या अफवांवर सायरस पुनावाला म्हणाले…