मुंबई : सरकारी नोकरी मधील मराठा आरक्षण रद्द झाल्याने, राज्य सरकारवर चहूबाजुने टिकेची झोड उठत असतानाच, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आरक्षणाच्या मुद्यावरून धारेवर धरले आहे.
“अजितदादा आमचे हक्क म्हणजे काय सापशिडीचा खेळ नव्हे, बहुजनांविषयी तुमच्या मनात आकस असून तुमचे सरकार त्यांच्या आरक्षणाच्या हक्काचा गळचेपी करत आहे”, असा सवाल पडळकर यांनी अजित पवार यांना विचारला आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, “बहुजनाचे अधिकार म्हणजे काय बारामतीची जहागिर नाही? कदाचित तुम्हाला काही खास अधिकाऱ्यांचीच सोय लावून वसूली वाढवायची आहे काय? असा सवाल जनतेला पडतोय. पदोन्नती बाबतचे तीन्हीGR त्वरीत रद्द करा, अन्यथा मी २५ मे पासून मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन करेल.” असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
दादा!#बहुजनांचे हक्क आणि अधिकार हे तुम्हाला बारामतीची जहागिर वाटतात का?कदाचित तुम्हाला काही खास अधिकाऱ्यांचीच सोय लावून #वसूली वाढवायची आहे का?असा प्रश्न जनतेला पडतोय.पदोन्नती बाबतचे तीन्हीGR त्वरीत रद्द करा,अन्यथा मी २५मे पासून #मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन करेल.@AjitPawarSpeaks pic.twitter.com/1u4DPPiUB2
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) May 17, 2021
“महाविकास आघाडी सरकार रयतेचा राजा छ.शिवाजी महराज, क्रांतीसुर्य महात्मा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना काळीमा फासण्याचे काम करत आहे. आरक्षण इथल्या शोषित आणि मागासलेल्या समाजासाठी न्यायाचा आधार आहे. बहुजनांच्या हिताच्या बाबतीत आपले सरकार सतत गळचेपीचं धोरण राबवत आहे. फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेण्याचा कोणताच नैतिक अधिकार महाविकास आघाडीला आता राहिलेला नाही”, अशी घणाघाती टीका देखील पडळकर यांनी या पत्रातून केली आहे.
Read Also :
- “…म्हणून आपण मनोरुग्ण झाले आहात, सांभाळा स्वतःला”, सातपुतेंचा शाब्दिक हल्लाबोल
- देशात रुग्णसंख्या तीन लाखांच्या खाली, मृतांची संख्या चिंता वाढवणारी
- ‘शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सैतानानो नरकात सुद्धा जागा मिळणार नाही’
- ‘अजित पवारांनी ‘कोव्हॅक्सिन’चा प्रकल्प विदर्भातून पुण्याला पळवला’
- काँग्रेस नेत्यांनी ट्विटर प्रोफाइल बदलत पंतप्रधान मोदींना केला ‘हा’ सवाल