परभणी : लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. सकाळापासून राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. अशातच परभणी जिल्ह्यातील बलसा खुर्द या गावात गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. सकाळपासून एकही मतदाराने मतदान केंद्रावर न जाता मतदान केलं नाही. त्यानंतर आता थेट जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांची भेट, अन् विनोद पाटलांची संभाजीनगरमधून माघार, काय घडतंय ?
परभणी जिल्ह्यातील बलसा खुर्दमध्ये लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील अतिक्रमाविरोधातील निवेदन देऊनही कारवाई होत नसल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार दिसून येत आहे. १२९५ मतदान असलेल्या या केंद्रावरती सकाळपासून एकही नागरिकाने मतदानाचा अधिकार बजावला नाही.
बलसा गाव काही वर्षांपूर्वी प्रशासनाकडून पुनर्वसन करण्यात आले होते. अतिक्रमणाच्या नाराजीतून हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी रघूनाथ गावडे यांनी बलसा खुर्द गावाला भेट देत गावकऱ्यांशी समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र गावकरी आपल्या मागण्यांवर ठाम राहिले आहेत. अशातच सध्या अचारसहिंता सुरू आहे. अचारसहिंता संपल्यानंतर सगळ्या मागण्या मान्य केल्या जातील असे रघूनाथ गावडे यांच्याकडून सांगितलं जात आहे. मात्र तरीही गावकरी आपल्या मागण्यांकरीता आपल्या निर्णयावर ठाम राहिले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“इंग्रजी बोलतो मग फार शहाणा झाला का ?” शरद पवारांनी सुजय विखेंना फटकारलं
हेही वाचा…“इंग्रजी बोलतो मग फार शहाणा झाला का ?” शरद पवारांनी सुजय विखेंना फटकारलं
हेही वाचा…‘मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाची औपचारिकता बाकी’, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
हेही वाचा…“बारामती जिंकून आणा, भाजपचाच दादांना आदेश”, शरद पवारांचं मोठं विधान