छत्रपती संभाजीनगर : महायुतीकडून छत्रपती संभाजीनगरमधून मंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या विनोद पाटलांची थेट मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी विनोद पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा विनोद पाटील यांनी केली. मात्र आपला पाठिंबा हा महायुतीला किंवा महाविकास आघाडीला असणार ? याबाबत कोणतंही भाष्य केलं नसल्याने तो पेच कायम राहिला आहे.
मराठा समाजाने मला पाठिंबा दिला आहे. मात्र जर राजकीय सौदा केला असता तर माझी किमंत शुन्य झाली असती. माझ्यासारख्या किरकोळ कार्यकर्त्यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी भेट घेतली. यावेळी आमच्यात कुठल्याही आश्वासनावर चर्चा झाली नाही. मला कुठल्याही पदाची लालसा नाही. मतदारसंघातील सगळ्या लोकांशी संवाद साधून हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितलंय.
संपुर्ण जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर जनतेशी संवाद साधणार. जो उमेदवार विकासासंदर्भात भूमिका घेईल. त्याला आपला पाठिंबा असणार असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमधून निवडणुक लढवावी लागेल असं मुख्यमंत्रांनीच सांगितलं होतं. मात्र शहारातील दोन आमदार आणि एका खासदाराने टोकाचा विरोध केला. निवडणुकीला उभा राहिलो असतो तर निवडून आलो असतो असं वक्तव्य विनोद पाटलांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. आपली उमेदवारी मागे घेताना विनोद पाटलांनी आपण महायुती वा महाविकास आघाडी, या दोघांनाही पाठिंबा देणार नाही. असेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा..म्हणून आज अमरावतीकरांना बळवंत भाऊंची गरज “, यशोमती ठाकुरांनी विरोधकांवर डागलं टिकास्त्र
हेही वाचा…“जिल्ह्याला लागलेली दृष्ट कशी दुर करायची ते माहितीय”, विश्वजीत कदमांनी दिला कडक इशारा
हेही वाचा…“मोदींनी किती मंगळसुत्राची प्रतिष्ठा ठेवली”, ? राऊतांचा भाजपचा खोचक सवाल
हेही वाचा…“नजरचुकीने खासदार झालेल्यांना आता थारा नाही”, दिलीप मोहिते पाटलांचा कोल्हेंवर निशाणा