सोलापुर : गेल्या अनेक दिवसापासून सांगली लोकसभा मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडतांना दिसत आहेत. कॉंग्रेस नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे सांगलीत कॉंग्रेसअंतर्गत मोठा गोंधळ समोर आलाय. अशातच आज कॉंग्रेसचा सांगलीत कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात कॉंग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी मोठं विधान केलंय.
हेही वाचा…“कोल्हेंनी राऊतांसारखी सकाळी उठून बडबड करू नये”, कोल्हेंच्या टिकेला आढळरावांचा पलटवार
विश्वजीत कदम म्हणाले की, आमच्या एका तरूण कार्यकर्ता कुस्तीगीर पैलवानाने प्रवेश केला. त्यावेळीच आम्ही कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून तो विषय विस्तृतपणे मांडला. हे सर्व सुरू असतानाच उद्धव ठाकरे सांगलीत आले आणि त्यांनी त्यांची उमेदवारी जाहीर करून टाकली. परंतु लोकशाही आहे. त्यात काहीही करता येतं. परंतु कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, आमदार आहेत. त्यांना किमान विचारलं पाहिजे होतं. असं म्हणत विश्वजीत कदम यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, आमचा कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर आरोप नाहीत. त्याबद्दल त्यांनी गैरसमज करून घेऊ नये. परंतु कॉंग्रेसच्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यां समोर हा प्रकार घडला आहे. हे सर्व कुणी केलं आहे ते माहिती आहे. सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये वसंतराव, पंतगराव कदम साहेंबाचा वारसा मिळाला आहे. परंतु कधी कधी म्हणता मनासारखं होत नसेल तर दृष्ट लागते. आमच्या जिल्ह्याला दृष्ट लागली आहे. परंतु ती दुर कशी करायची ती आम्हाला चांगलचं माहिती आहे. असं म्हणत विश्वजीत कदम यांनी विरोधकांना इशारा दिलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“मोदींनी किती मंगळसुत्राची प्रतिष्ठा ठेवली”, ? राऊतांचा भाजपचा खोचक सवाल
हेही वाचा…“नजरचुकीने खासदार झालेल्यांना आता थारा नाही”, दिलीप मोहिते पाटलांचा कोल्हेंवर निशाणा
हेही वाचा…“समाजासाठी चंदणाप्रमाने झिजले, त्या कार्याचा सुगंध आजही दरवळतोय,” सुनेत्रा पवार