रायगड : माझा मच्छीमार बांधव दर्याच्या तुफानाला, येणार्या संकटांना सामोरे जातो ; याच कष्टकरी समाजाने हिंदवी स्वराज्याचे रक्षण केले. माझा मच्छीमार बांधव दर्याच्या तुफानाला. येणार्या संकटांना सामोरे जावून पुन्हा त्याच ताकदीने उभा राहतो. सर्वाधिक चलन माझ्या याच मच्छीमार बांधवांकडून मच्छीमारी व्यवसायातून देशाला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे नेतृत्व करत स्वराज्याचे रक्षण याच कष्टकरी समाजाने केले. असं म्हणत रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी कोळी समाज महासंघाच्या मेळाव्यात कृतज्ञता व्यक्त केली. महायुतीच्यावतीने कोळी समाज महासंघाचा भव्य मेळावा रेवदंडा शहरात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. माझ्या मच्छीमार बांधवांचा डिझेलचा परतावा, यापुढे कधी थकीत राहणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा…भरसभेत भोवळ आली, आराम करून नितीन गडकरी पुन्हा भाषणासाठी व्यासपीठावर
पुढे बोलतांना तटकरे म्हणाले की, “नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर आणि मी केंद्रात खासदार म्हणून गेल्यानंतर केंद्रसरकारच्या माध्यमातून अनेक योजना मच्छीमार बांधवांच्या विकासासाठी राबवल्या जातील. अलिबाग मतदारसंघासाठी जयंत पाटील यांनी जितका निधी आणला नाही. त्यापेक्षा तिप्पट निधी आमदार महेंद्र दळवी यांनी अलिबाग मतदारसंघात आणला. असा दावा देखील सुनील तटकरे यांनी केलाय.
जयंत पाटील कालच शरद पवारसाहेबांना घेऊन मोर्बा या गावी आले होते. परंतु त्या सभेला जिल्हयातील लोक आणूनही गर्दी झाली नाही. इतकी गर्दी फक्त रेवदंडा मच्छीमार, कोळी बांधवांनी केली. जयंत पाटील तुम्ही नितीमत्ता, राजकारण आणि अक्कल आम्हांला शिकवू नका, असे तटकरेंनी खडेबोल सुनावतानाच स्वतःचे आत्मपरीक्षण करा… तुमचा बालेकिल्ला म्हणता मग तुम्ही पिछाडीवर का गेलात यावर विचार न करता माझ्यावर टिका का करता, असा सवालही त्यांनी जयंत पाटील यांना केला.
हेही वाचा…अर्चना पाटलांसाठी मोदींची धाराशिवमध्ये सभा, ‘या’ दिवशी राजकारण तापणार
दरम्यान, या मतदारसंघात ४ जूनला घड्याळयाचा गजर ऐकायला मिळेल आणि विधानसभेला महेंद्र दळवी यांच्या धनुष्यबाणावर सर्वाधिक मताधिक्य असेल, असे सांगतानाच यावेळी पहिल्यांदा घड्याळ या चिन्हासमोरील बटण तुम्हाला दाबायचे आहे. त्यामुळे उद्याच्या भविष्यात या भागाचे चित्र बदललेले दिसेल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवार गटाने जाहीर केला आपला जाहीरनामा, जाहिरनाम्यात कोणत्या गोष्टी ? वाचा संपुर्ण यादी
हेही वाचा…“मासा जसा पाण्याबाहेर पडल्यावर तडफडतो, तसा..,” सुनील तटकरेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
हेही वाचा…धाराशिवमध्ये ३१ उमेदवार रिंगणात, १ लाख ६ हजार ४९९ नवमतदार कुणाच्या पारड्यात मत टाकणार ?