पुणे : महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाला दहा जागा देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी शरद पवार गटातील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर काही उमेदवार येत्या काही दिवसात उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. अशातच आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यात अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे.
हेही वाचा…“आता लबाडा घरचं आवतान जेवल्याशिवाय खरं नाही”, शरद पवारांनी मोदींना दिलं प्रत्युत्तर
आज शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, नागरी भागाला अनुकूल ठरणारी जीएसटीची फेररचना, संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि नैसर्गिक आपत्तीतील कांदा, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आधारभूत व्यवस्था निर्माण करणार असल्याचे जयंत पाटलांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…अन् नितीन गडकरींना भरसभेत आली भोवळ, नेमकं काय झालं ? प्रकृती कशी ?
तसेच कांदा दरात स्थिरता आणण्यासाठी आयात-निर्यात धोरण आखणार आहोत, तसेच मुंबई-गोवा महामार्ग जलद गतीने पूर्ण करणार, केंद्र सरकारव्या ‘स्मार्ट सिटी’ अभियानाची वस्तुस्थिती श्वेतपत्रिकेद्वारे मांडणार, स्थलांतरित मजूर-कामगारांच्या कल्याणासाठी आयोगाची स्थापना करणार, प्रत्येक महापालिका क्षेत्रात मेडिकल कॉलेजची उभारणी करणार, तसे सर्वसामान्यांना आरोग्यव्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी शहरांमध्ये मोहल्ला क्लिनिक उघडणार असल्याचे जयंत पाटलांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मासा जसा पाण्याबाहेर पडल्यावर तडफडतो, तसा..,” सुनील तटकरेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
हेही वाचा…धाराशिवमध्ये ३१ उमेदवार रिंगणात, १ लाख ६ हजार ४९९ नवमतदार कुणाच्या पारड्यात मत टाकणार ?
हेही वाचा…भरसभेत भोवळ आली, आराम करून नितीन गडकरी पुन्हा भाषणासाठी व्यासपीठावर
हेही वाचा…अर्चना पाटलांसाठी मोदींची धाराशिवमध्ये सभा, ‘या’ दिवशी राजकारण तापणार