पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येऊन कॉंग्रेस पक्षाला, उद्धव ठाकरेंच्या पक्षाला शिव्या देतात. आम्हाला देखील मोदी शिव्या देतात. नरेंद्र मोदी यांनी आम्हाला शिव्या द्याव्यात. पण १० वर्षात तुम्ही काय केलं ? त्याचं उत्तर अगोदर द्या. असा सवाल शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांना केलाय. माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी शरद पवारांनी जाहीर सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात जाहीर सभा होत आहेत. त्या सभेतून नरेंद्र मोदी शरद पवारांसह कॉंग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेवर टिका करीत आहेत. त्यावर शरद पवारांनी पलटवार केलाय. गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारने देशातील जनतेवर खुप अन्याय केला आहे. महागाई असो किंवा बेरोजगारी यासंबंधी मोदींनी दिलेली आश्वासने पाळली नाहीत. आता लबाडा घरचं आवतान जेवल्याशिवाय खरं नाही. ही स्थिती मोदी साहेबांनी देशात निर्माण केली असल्याची टिका शरद पवारांनी केलीय.
हेही वाचा…अन् तटकरे जुन्या आठवणी सांगत क्षणभर गहिवरले, सांगितला ‘तो’ जुना किस्सा
दरम्यान, इतकं उत्तम काम त्यांनी केलं, पण केंद्र सरकार सहकार्य करत नाही म्हणून त्यांनी मोदींवर टिकाटिप्पणी केली. आज त्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकलंय. देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री तुरुंगात आहे. हीच स्थिती रांचीला आहे. झारखंड राज्य हे आदिवासींचे राज्य, आदिवासी मुख्यमंत्री. आदिवासींकडे केंद्र सरकार लक्ष देत नाही, म्हणून त्यांनी केंद्र सरकारवर टिका केली, म्हणून आदिवासी मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकलंय. याचा अर्थ एकच की, इंग्रजांच्या काळात ज्यापद्धतीने धरपकड होत होती, लोकांना संघर्ष करायला लागत होता. आज ती अवस्था मोदी साहेबांनी आज देशात केलीये. म्हणून त्यांचे सर्व कामकाज हुकूमशाहीच्या दिशेने सुरु आहे. असेही शरद पवार म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…अन् नितीन गडकरींना भरसभेत आली भोवळ, नेमकं काय झालं ? प्रकृती कशी ?
हेही वाचा…आढळराव पाटील उद्या उमेदवारी अर्ज भरणार, महायुतीकडून पुण्यात मोठं शक्तिप्रदर्शन
हेही वाचा..“…पण तुम्हाला पवारसाहेबांची आठवण आलीय”, तटकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल
“देवेंद्र फडणवीस हा एकच बाप, जो शरद पवारांना पुरून उरला”, कुणी केला घणाघात ?
हेही वाचा…“परभणीमध्ये चमत्कार घडणार अन् महादेव जानकर दिल्लीत जाणार”, मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान