कोल्हापुर : सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात प्रचार सभा आणि रॅलीचा धुमधडका सुरू आहे. यातच आता महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये लढत होत असून दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप होतांना दिसत आहेत. अशातच देवेंद्र फडणवीस हा एकच बाप असा आहे. जो पवारांना पुरून उरला आहे. अशी टिका रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत यांनी केली आहे. ते कोल्हापुर येथे बोलत होते.
हेही वाचा…‘लाव रे तो व्हिडिओ, दाखवत मल्हार पाटलांनी विरोधकांचा भांडाफोड केला, एकच चर्चा
सदाभाऊ खोत म्हणाले की, ७० वर्षांपासून महाराष्ट्रात मुठभर सरदारांचं राज्य होतं. या सरदारांना पायाखाली कचाकचा तुडवण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळेच शरद पवारांसारख्या नेत्याला त्यांची जात काढावी लागते आहे. पण पवार तुमची जात वेगळी असती, तुमचं आडनाव फडणवीस असतं तर महाराष्ट्रात कुणी हुंगलंही नसतं. मात्र देवेंद्र फडणवीस हा एकच बाप असा आहे जो पवारांना पुरून उरला आहे. त्यामुळे या वयातही शरद पवारांना खोटं बोलत रेटून चालावं लागत असल्याची टिका सदाभाऊ खोत यांनी पवारांवर केलीय.
हेही वाचा…“तानाशाही करणाऱ्यांच्या अहंकाराचे हनुमान जयंती दिवशीच दहन झाले”
दरम्यान, पुढे बोलतांना सदाभाऊ खोत म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला मोठे यश संपादन होईल. असं चित्र निर्माण झालं आहे. पश्चिम महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांच्या विचाराने मंतरलेला प्रदेश आहे. महापुरूषांचे नाव घेणारी माणसं सध्या वाड्यामध्ये आहेत. आत्ताची लढाई ही वाडा विरूद्ध गावगाडा अशी आहे. या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून हे सगळे वाडे उद्धवस्त आहेत. रयतेचा विजय निश्चितपणे होणार असल्याचा विश्वास देखील खोतांनी व्यक्त केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“परभणीमध्ये चमत्कार घडणार अन् महादेव जानकर दिल्लीत जाणार”, मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान
हेही वाचा…अन् तटकरे जुन्या आठवणी सांगत क्षणभर गहिवरले, सांगितला ‘तो’ जुना किस्सा
हेही वाचा…मोठी बातमी…! शिखर बँक घोटाळा प्रकरणात सुनेत्रा पवारांना क्लीन चीट