अमरावती ; महायुतीच्या अधिकृत उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची सभा होत आहे. मात्र त्याआधी अवकाळी पावसाने भाजपच्या सभा मंडपाचा काही भाग कोसळला आहे. त्याआधी याच मैदानासाठी प्रहारचे बच्चू कडू चांगलचे आक्रमक झाल्याचे दिसत आहे. त्यावरून अमरावती लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता कॉंग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमित शाह यांच्यावर जोरदार टिका केली आहे.
अमरावती मध्ये पुन्हा एकदा अहंकाराचा पाडाव होताना दिसला. या आधी रामनवमी पूर्वी भाजपच्या उमेदवाराचा मंडप वाऱ्याने उध्वस्त केला होता. आता केंद्रीय गृहमंत्र्याच्या सभेसाठी परवानगी नसताना आचारसंहितेचे उल्लंघन करून मैदानात मंडप उभारण्याचा प्रयत्न केला असता हा मंडपच वाऱ्याने पुन्हा उध्वस्त केला आहे. तानाशाही करणाऱ्यांच्या अहंकाराचे हनुमान जयंती दिवशीच दहन झाले आहे. अशी खोचक टिप्पणी यशोमती ठाकूर यांनी केलीय.
हेही वाचा…“आढळरावांना मोठे मताधिक्क मिळवून देणार”, मनसेच्या कार्यकर्त्यांचा वाघोलीत निर्धार
अमरावतीच्या सायन्स कोअर मैदानावर २१ आणि २२ एप्रिल रोजी नवनीत राणा यांच्या सभेसाठी परवानगी देण्यात आली होती. यासभेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार आहेत. तर त्याच बच्चू कडू यांना २३ आणि २४ एप्रिलसाठी परवानगी मिळाली होती. त्यासाठी बच्चू कडू यांनी रितसर पैसेही भरण्यात आले होते. मात्र अमित शाह यांचा दौरा २४ एप्रिल रोजी ठरल्यामुळे पोलिसांनी बच्चू कडू यांना मैदानावर येऊ दिले नाही. त्यामुळे बच्चू कडू यांनी पोलिसांसमोरच मोठा राडा केल्याची माहिती समोर येत
दरम्यान, या संपुर्ण राडा प्रकरणावर कॉंग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, महायुतीतील एका पक्षाने अमरावतीतील सभेसाठी परवानगी घेतली होती, तयारी ही केली, मात्र केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी नसतानाही पोलीस बळाचा वापर करत मैदान रिकामं करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अमरावतीची राजकीय संस्कृती महान आहे. आज पर्यंत या जिल्ह्यात कधीही अशी घटना झालेली नाही.
आमचे पक्ष वेगवेगळे असले तरी भारताचं संविधान सर्वोच्च आहे. भारतीय संविधानाने सर्वांना निवडणूक लढण्याचा आणि प्रचार करण्याचा समान अधिकार दिलेला आहे. निवडणूक आयोग बघ्याची भूमिका घेत आहे, ही हुकूमशाहीची सुरूवात आहे. इतक्या वर्षांच्या काँग्रेसच्या सत्तेच्या काळात कधी अशा पद्धतीची दडपशाही केली गेली नाही. भाजपने देशभरात सत्तेचा गैरवापर सुरू केलाय. याच साठी देशात काँग्रेसचं सरकार पाहिजे. ही हुकूमशाही मोडून काढण्यासाठी देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नाही. आता या धनशक्तीला अमरावतीतील जनशक्ती हरवल्याशिवाय राहणार नाही. असा इशाराही त्यांनी दिलाय.
READ ALSO :
हेही वाचा..“हनुमानजींनी काम दाखवलं, एक लाथ मारली अन् अमित शाहांचा सभामंडप खाली पडला”
हेही वाचा…अमरावतीत मोठा राडा, बच्चू कडू आक्रमक, विरोधकांचाही हल्लाबोल