मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकीचा हंगाम सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांच्या प्रचार सभा बैठका आणि रॅली निघत आहेत. अशातच आता राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधी विषयी पुन्हा एकदा मोठे भाष्य केलंय. त्यामुळे राज्यात आता पुन्हा पहाटेच्या शपथविधी विषयी चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवार म्हणाले की, ज्यावेळी एकनाथ शिंदे सुरतला गेले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे सर्व आमदार खासदार एकत्र बसले होते. त्यावेळी भाजपला पाठिंबा देण्यासंदर्भात साहेबांना एक पत्र लिहिलं होतं. त्यावर सगळ्यांच्या सह्या होत्या. ते पत्र राजेश टोपे घेऊन साहेबाकडे गेले होते. असं म्हणत आता राजेश टोपे यांना कधीतरी विचारलं पाहिजे की, तुम्ही अशा पद्धतीचे पत्र तुम्ही साहेबाकडे घेऊन गेले होते का ? तसेच त्या पत्रामध्ये काय होतं? असं विचारा असंही अजित पवार म्हणाले.
पत्रामध्ये दोन वर्षात कोरोनाच्या काळात काही पण विकास झाला नाही. आता कुठे विकास होत आहे. आता कुणाला तरी निधी मिळत आहे. आम्ही लोकांशी बांधील आहोत आमच्या मतदारसंघांमध्ये आम्हाला लोकांचा विकास ज्या पद्धतीने भाजप शिवसेना एकत्र आलो होतो. त्या पद्धतीने आपल्याला देखील त्यांच्यासोबत गेलं पाहिजे. असंही ते म्हणाले.
2014 तुम्ही बाहेरून भाजपला पाठिंबा दिला. त्यानंतर 2017 मध्ये तुम्ही भाजपसोबत जाण्याचा विचार केला. 2019 मध्ये देखील हाच विचार झाला. त्यामुळे एखादा कुणी सकाळी उठून असा शपथविधी घेणार का ? असाही सवाल अजित पवारांनी केला.
इतक्या मोठ्या राज्याचा कारभार करत असताना राज्यात राष्ट्रपती राजवट आली होती.
राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात आली. आता ती राष्ट्रपती राजवट कोणी मागे घेण्यात घेतली याची माहिती आता देवेंद्र फडवणीस यांच्याकडून घेतले पाहिजे. असा इशाराही अजित पवारांनी दिला.