अमरावती : जात-धर्मामध्ये तेढ निर्माण करणारा प्रचार करून ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र या ही परिस्थितीत केवळ संविधानाच्या रक्षणाकरिता, अमरावतीच्या समृद्ध राजकीय-सामाजिक वारश्याचं जतन करण्याकरिता काँग्रेसचा उमेदवार जीवाचं रान केलं. अपुऱ्या संसाधनामुळे या उमेदवाराचा प्रचार थांबला नाही, कमी पडला नाही. लोकांमध्ये जात, लोकांमध्ये मिसळत, त्यांच्या सोबत कधी पायी चाल, कधी जमीनीवर झोप असं करत हा उमेदवार आज मैदानात आहे. माझे बंधू आणि दर्यापूर चे आमदार, अमरावती लोकसभा क्षेत्राचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार बळवंत भाऊ वानखडे यांच्या रूपाने महाराष्ट्राला पुन्हा एकदा आर. आर. पाटील सापडला अशी भावना माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा…“समाजासाठी चंदणाप्रमाने झिजले, त्या कार्याचा सुगंध आजही दरवळतोय,” सुनेत्रा पवार
गेल्या काही दिवसापासून अमरावतीत राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. महायुतीकडून नवनीत राणा, तर महाविकास आघाडीकडून बळवतं वानखेडे मैदानात उभे राहिले आहे. यातच प्रहार जनशक्ती पक्षाकडून दिनेश बुब देखील निवडणुकीत उतरले आहेत. यातच मागील दोन दिवसापूर्वी सभेच्या मैदानावरून मोठा राडा झाला होता. त्यावरून यशोमती ठाकूरांनी मोठं विधान केलं. अमरावतीमध्ये धनशक्ती विरूद्ध जनशक्ती असा मुकाबला सुरू आहे. अंडरवर्ल्ड पासून बड्या बिल्डरांचा पैसा अमरावतीमध्ये खेळवला जात आहे. या धनशक्तीच्या जोरावर पोलीस-प्रशासन नाचवलं जातंय. कोट्यवधी रूपये उधळून प्रचार यंत्रणा राबवली गेली. आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन करून लहान मुलांचा, धार्मिक प्रतिकांचा वापर केला गेला असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा…“कोल्हेंनी राऊतांसारखी सकाळी उठून बडबड करू नये”, कोल्हेंच्या टिकेला आढळरावांचा पलटवार
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, निष्कलंक चारित्र्य, साधी राहणी, कधी कुणाशी फटकून वागणं नाही. मात्र कामात कणखर, विकासाची मानवीय दृष्टी आणि संवेदनशील मन.. या बळवंत भाऊंच्या जमेच्या बाजू. तुम्ही कधीही बळवंत भाऊंना जाऊन भेटू शकता, बोलू शकता. बळवंत भाऊ सामान्य शेतकऱ्याच्या घरात जन्माला आले. समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहात राहून शिकलेले भाऊ, लहानपणापासून गरीबी पाहिली, त्यामुळे आज अमरावतीकरांची दुःखं त्यांना माहितीयत. त्यांना मतं मागण्यासाठी नौटंकी करावी लागत नाही. असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणांना टोला लगावला.
तर आज जनतेने त्यांची निवडणूक हातात घेतली आहे. या निवडणुकीसाठी लोकांनी स्वतःच्या खिशातले पैसे टाकून प्रचार केला. सध्याच्या काळात जिथे निवडणुका महागड्या होतायत तिथे हे एक आशादायक चित्र महाराष्ट्रात दिसतंय. संविधानाच्या रक्षणासाठी आणि अमरावतीतील शांतता-सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून आज अमरावतीकरांना बळवंत भाऊंची गरज आहे. राजकारणात चांगली माणसं आहेत. ती माणसं पैशाने नाहीत, पण माणुसकीने श्रींमत आहेत. मनाची ही श्रीमंती टिकली पाहिजेत. या महाराष्ट्राने आर. आर. पाटील यांच्यासारखा चारित्र्यसंपन्न नेता पाहिला. अशा भावना देखील त्यांनी व्यक्त केल्या.
दरम्यान, राजकारणातील साधेपणाचं दुसरं नाव म्हणजे आर. आर. पाटील असं म्हटलं जायचं. आबा आज आपल्यात नाहीत, मात्र त्यांची छबी मला बळवंतभाऊंमध्ये दिसते. बळवंत भाऊंसारखे कर्मयोगी, संतवृत्तीची लोकं राजकारणात असली पाहिजेत, संसदेत असली पाहिजेत. अमरावतीकरांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. असे आवाहन देखील त्यांनी केलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“जिल्ह्याला लागलेली दृष्ट कशी दुर करायची ते माहितीय”, विश्वजीत कदमांनी दिला कडक इशारा
हेही वाचा…“मोदींनी किती मंगळसुत्राची प्रतिष्ठा ठेवली”, ? राऊतांचा भाजपचा खोचक सवाल
हेही वाचा…“नजरचुकीने खासदार झालेल्यांना आता थारा नाही”, दिलीप मोहिते पाटलांचा कोल्हेंवर निशाणा