नवी दिल्ली : उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या वेळी मंत्रालयात माझ्या चेंबरमध्ये राष्ट्रवादीचे सगळेच नेते जमले होते. त्यावेळी भाजपसोबत जाण्यासंदर्भात एक पत्र तयार केलं होतं. त्या पत्रावर आमच्या सगळ्याच्याच सह्या होत्या. त्यात अशोक पवारांची, रोहित पवारांची, राजेश टोपे, जयंत पाटलांची, प्राजक्त तनपुरेंची सही होती. अन् ते पक्षच राजेश टोपे साहेबांजवळ घेऊन गेले होते.
हेही वाचा…“बारामती जिंकून आणा, भाजपचाच दादांना आदेश”, शरद पवारांचं मोठं विधान
तेव्हा आमच्या कुणाच्याच मतदारसंघात विकासाची कामं झालेली नव्हती. त्यात दोन वर्ष कोरोनाच्या काळात गेलीत. लोक आम्हाला कामाकरता निवडून देतात. त्यांचा विकास व्हावा म्हणून निवडून देतात. विकासाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात म्हणून निवडून देतात. त्यामुळेच आम्हाला सरकारमध्ये जायचं होतं. त्यावेळी साहेबांनी मला प्रफुल पटेल यांना दिल्लीत जाऊ नका. तुम्ही इथेच फोनवर चर्चा करा असं सांगितलं होतं.
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांची भेट, अन् विनोद पाटलांची संभाजीनगरमधून माघार, काय घडतंय ?
पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले की, ज्यावेळी अमित शाह यांना फोनवरून सरकारबाबत चर्चा केली. त्यावेळी अमित शाह यांनी आम्हाला दिल्लीत बोलावलं होतं. अशा गोष्टी फोनवर नाही तर प्रत्यक्ष बोलल्या पाहिजेत. असं सांगण्यात आलं. परंतु साहेबांनी आम्हाला दिल्लीत जाऊ दिलं नाही. अन् इथूनच फोनवर चर्चा करण्यास सांगितलं.
यातच मागच्या काही वर्षाचा अनुभव होता. अनेकदा आमच्याबरोबर यायचं ठरवलं. अनेकदा तुम्ही आम्ही पाठिंबा न मागता तुम्हाला आम्हाला पाठिंबा दिला. अशा घटना घडल्यात. त्यानंतर तुम्ही बदलता. त्याच्यामुळं तुमची भूमिका ठाम नसते. त्यामुळे तुमची फोनवर बोलण्यासारखी विश्वासार्हता नाही. त्यामुळे समोर या. चर्चा करू. परंतु नंतर साहेबांनी सांगितलं की तिकडं जायचं नाही. असे अजित पवार म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…परभणीतील बलसा खुर्दमध्ये गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार, कारण आलं समोर
हेही वाचा…“इंग्रजी बोलतो मग फार शहाणा झाला का ?” शरद पवारांनी सुजय विखेंना फटकारलं
हेही वाचा…“इंग्रजी बोलतो मग फार शहाणा झाला का ?” शरद पवारांनी सुजय विखेंना फटकारलं
हेही वाचा…‘मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाची औपचारिकता बाकी’, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास