मुंबई : केंद्र सरकारने खतांच्या किंमती वाढवल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारने खतांच्या किंमती कमी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली असून, अन्यथा राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला असून, ‘शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सैतानानो नरकात सुद्धा जागा मिळणार नाही’, अशी सणसणीत टीका त्यांनी केली आहे.
एकीकडे शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रु टाकुन केंद्रसरकार शेतकऱ्यांचा कैवारी असे चित्र उभे करायचे तर दुसरीकडे खताचे भाव वाढवून दुपटीने शेतकऱ्यांना लुटायचे. अरे तुमच्यापेक्षा सैतान परवडले! शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सैतानानो नरकात सुद्धा जागा मिळणार नाही.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 16, 2021
अमोल मिटकरी म्हणाले की, एकीकडे शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रु टाकून केंद्र सरकार शेतकऱ्यांचा कैवारी असे चित्र उभे करायचे, तर दुसरीकडे खतांचे भाव वाढवून दुप्पटीने शेतकऱ्यांना लुटायचे. अरे तुमच्यापेक्षा सैतान परवडले! शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सैतानानो नरकात सुद्धा जागा मिळणार नाही, अशी जोरदार टीका मिटकरी यांनी मोदी सरकारवर केली आहे.
केंद्र सरकारने ऐन खरिपाच्या तोंडावर खतांचे भाव वाढवुन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत सुड भावनेने वागत असल्याचा परत प्रत्यय येतोय. यावर भाजप तोंड उघडायला तयार नाही. मोदी सरकारच्या दुष्कृत्यांचा निषेध, असेही ते म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने खतांच्या दरवाढीवरून आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत ही दरवाढ कमी झाली पाहिजे. कोरोनामुळे शेतकरी आधीच अडचणीत असताना खतांची दरवाढ करून केंद्राने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सरकारने हे दर कम करावे, अशी मागणी केली आहे.
Read Also :
- ‘अजित पवारांनी ‘कोव्हॅक्सिन’चा प्रकल्प विदर्भातून पुण्याला पळवला’
- … म्हणून पुण्यात आज लसीकरण पूर्णपणे बंद राहणार
- तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाहांनी घेतला तयारीचा आढावा
- केंद्राकडून खतांच्या किंमतीत वाढ, राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर करणार आंदोलन
- मराठा समाजाच्या आंदोलनाला भाजपचा पाठिंबा – प्रवीण दरेकर