नवी दिल्ली : तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट करण्यात आले आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी तयारीचा आढावा घेतला.
अमित शहा यांनीही महाराष्ट्र, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसह दमण-दीव आणि दादरा-नगर हवेलीतील तयारीचा आढावा घेतला. तसेच, काही महत्त्वाच्या सूचना देखील त्यांनी यावेळी राज्यांना दिल्या.
चक्रीवादळाचा परिणाम होण्याची शक्यता पाहता गृहमंत्र्यांनी खासकरून सर्व आरोग्य सुविधांच्या सज्जतेचा आढावा घेतला. सर्व कोविड रुग्णालये, लॅब, लस कोल्ड चेन व इतर वैद्यकीय सुविधांबाबत पुरेशा प्रमाणात बॅकअपची व्यवस्था करण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या. तसेच, वादळामुळे येणारा अडथळा लक्षात घेता रुग्णालयांमध्ये आवश्यक असणारी सर्व औषधे व पुरवठ्यांचा पुरेसा साठा सुनिश्चित करावा, असे ते म्हणाले.
ऑक्सिजन तयार करणाऱ्या प्लांटच्या बाजूला जर तात्पुरत्या स्वरूपातील हॉस्पिटल उभारले असल्यास, गरज पडल्यास अशा रुग्णांना इतर रुग्णालयात हलवले जावे. याशिवाय, आक्सिजन प्लांट्सवर होणाऱ्या परिणामाचा देखील त्यांना आढावा घेतला. तसेच, ऑक्सिजनचा साठा करण्यास देखील संगितले.
इंडियन कोस्ट गार्ड, नौदल, लष्कर आणि हवाई दलाच्या तुकड्यांनाही बचाव कार्यासाठी तयार ठेवण्यात आले आहे. विमान आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने देखरेख केल जाईल, असेही त्यांनी सांगितले.
Read Also :
- केंद्राकडून खतांच्या किंमतीत वाढ, राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर करणार आंदोलन
- मराठा समाजाच्या आंदोलनाला भाजपचा पाठिंबा – प्रवीण दरेकर
- संजय गायकवाडांनी शब्द पाळला, थेट चिकन बिर्याणी आणि अंड्यांचे केले वाटप
- नाशिकमध्ये व्यापाऱ्यांची दुकाने होणार सुरु? छगन भुजबळ घेणार आढावा बैठक
- ‘राज्याबद्दल खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना चांगल्या गोष्टी पचत नाहीत’