नाशिक : राज्यात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात बाधित रुग्णसंख्या जास्त प्रमाणात आढळत असून, त्यामुळे राज्यातला लॉकडाऊन १ जून पर्यंत वाढवण्यात आला आहे. याचाच परिणाम आर्थिक चक्रावर होत असून, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नाशिक, मधील व्यापाऱ्यांच्या अडचणी श्री. भुजबळ यांची भेट घेऊन, त्यांच्यासमोर मांडल्या.
आज झूम ऍपवर यासंदर्भातील बैठक संपन्न झाली. यात मंडळाने प्रामुख्याने व्यापार सुरु, व्यापाऱ्यांना आर्थिक मदत मिळणे, वीज बिल, मालमत्ता कर, बँक कर्जांवरील व्याज माफ करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीच्या गाळ्यांचे ३ महिन्यांचे भाडे माफ करणे, जीएसटी, इन्कम टॅक्स आणि विविध स्वरूपाचे कर भरण्यासाठीची मुदत सप्टेंबर २१ पर्यंत वाढवण्यात यावी, लघु व मध्यम व्यापाऱ्यांना, वार्षिक उलाढालीच्या १० % रक्कम वार्षिक ३ % व्याजाने कर्ज रूपाने देण्यात यावी, अश्या मागण्या केल्या.
यावर भुजबळ यांनी, व्यापाऱ्यांच्या अडचणी समजून घेत, शहर आणि जिल्ह्यातील महामारीने बाधित सक्रिय रुग्णसंख्येचा आढावा घेऊन, यानंतर व्यापार सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले आहे. नाशिक जिल्हयात, तसेच ग्रामीण भागामध्ये महामारीने बाधित रुग्णसंख्येचे प्रमाण कमी आले नाहीये. त्यामुळे जिल्ह्यात प्रशासनाला निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश, जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत,
Read Also :