मुंबई : न्यायालायने मराठा आरक्षणावर आपला निर्णय सुनावल्यानंतर, यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. तसेच यावरून राज्य सरकारवर मराठा समाजाच रोष वाढला असून, ५ जूनला आंदोलनाची हाक विनायक मेटे यांनी दिली आहे.
दरम्यान, भाजपसुद्धा सत्ताधारी आघाडी सरकारवर टीका करता असून, आता मराठा आरक्षणावर अभ्यास करण्यासाठी भाजपकडून एका समितीची स्थापन करण्यात आली असून, चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार, विनायक मेटे, नरेंद्र पाटील आणि श्रीकांत भारतीय यांचा समावेश आहे.
या बैठकीच्या आजच्या पहिल्या भेटीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीतील चर्चेविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर तोफ डागली. “फडणवीस सरकारने मराठा समाजाला घटनात्मक कार्यवाही करून आरक्षण दिलं होतं आणि ते उच्च न्यायालयातही टिकवलं होतं, पण ठाकरे सरकारने सत्तेत येताच या आरक्षणाचा खून केला. मुडदा पाडला. माती केली”, अशी जोरदार टीका पाटील यांनी केली आहे.
“महामारीचा फायदा घेऊन मराठा समाजाने आंदोलन करू नये, म्हणून सरकारकडून कठोर निर्बंध लावले जात आहेत. राज्य सरकारच्या या कृतीमुळं मराठा तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे”, असं सांगत त्यांनी, “मराठा समाजाच्या प्रत्येक आंदोलनात आम्ही खांद्याला खांदा लावून उभं राहणार आहोत. यासाठी आम्ही कायदेतज्ज्ञांची एक समिती स्थापन करणार आहोत. ही समिती मराठा आरक्षणात न्यायालयात टिकवण्यात आघाडी सरकार कुठं कमी पडलं याची पोलखोल करण्याचं काम करेल”, असं ते म्हणाले.
Read Also :