मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये देशात सध्या भिषण परिस्थीती आहे. दिवसाला साडेतीन लाखाच्या आसपास रुग्णांची भर पडत आहेत. तर हजारोंच्या संख्यने मृत्यू मुखी पडत आहे. देशातील भयावह परिस्थितीवरून शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेचा झोड उठवली आहे.
राऊत यांनी जर्मनीच्या चान्सलर अंजेला मर्केल यांचे उदाहरणही दिलं आहे. “करोनाग्रस्त प्रेतांना वाली नसल्यामुळे गंगेच्या प्रवाहात प्रेते वाहून येत आहेत आणि करोनावर लस बनवणारे डॉ. अदर पुनावाला राजकारण्यांच्या भीतीने देश सोडून तूर्तास निघून गेले. त्यामुळे शेण, गोमूत्र व यज्ञावरच भागवावे लागेल काय?,” असा सवाल राऊत यांनी मोदी सरकारला केला आहे.
संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे. “पंतप्रधान मोदी हे पाच वर्षे लोकप्रियतेच्या लाटेवर होते, पण मागील काही दिवसापासून त्यांच्यावर निरनिराळ्या बाजूंनी टीका होऊ लागली आहे. राज्यकर्त्यास आपल्याबद्दल नेहमीच चांगले ऐकण्याची सवय बरी नाही. तेव्हा टीका होत आहे ते चांगले लक्षण मानायला हवे. टीका करणारे बहुतेकजण विरोधी पक्षातले आहेत. तसे परदेशी मीडियाचेही लोक आहेत. भाजपात मोदी किंवा शहा यांचे टीकाकार फारसा आवाज करीत नाहीत, पण त्यांना टीकाकार नाहीत असेही नाही.
महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, सरदार पटेल, मोहम्मद अली जिना, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यावरही सतत टीका होत राहिली. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावून वृत्तपत्रांवर बंधने आणली. तरीही मिळालेल्या साधनांचा वापर करून लोक त्यांच्यावर टीका करीत होते. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांच्यावर काय कमी टीका झाली? टीका ही लोकशाहीची महत्त्वाची मात्रा आहे व जोपर्यंत टीका स्वीकारली जाते तोपर्यंत कोणत्याही देशात लोकशाही जिवंत आहे असे समजायला हवे,” असे राऊत यांनी म्हटले आहे.
Read Also :
- राजकीय नेत्यांनी दिली समाज माध्यमांवरून, राजीव सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली
- जिथे जन्म तिथेच मृत्यू.! खासदार राजीव सातव यांचा 46 वर्षाचा प्रवास….!
- राज्याने गमावला अभ्यासू नेता, काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन
- वीज कापणार नाही, ट्रान्सफॉर्मरही बसवणार नाही, या सरकारला शेतकऱ्यांच्या फक्त पुळका- डॉ. अनिल बोंडे
- राज्यात कपाळकरंटे आणि पांढऱ्या पायाचे सरकार आले आणि आमचे…सदाभाऊ खोतांची टीका