मुंबई : काँग्रेसचे सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे आज पहाटे ५ वाजता, पुण्याच्या जहांगीर हॉस्पिटल मध्ये निधन झाले. २३ एप्रिल रोजी महामारीची लागण झाल्याचे निदान झाल्यावर त्यांना जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांनतर त्यांच्यावर सर्वोत्तम डॉक्टरांकडून उपचार करण्यात येत होते.
दरम्यानच्या काळात त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे वृत्त देखील त्यांचे सहकारी विश्वजित कदम यांनी दिले होते, मात्र काल अचानक त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आणि आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर देशभरातून तसेच, राज्यातून अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
राजीव सातव उपचारांना चांगला प्रतिसाद देत होते. मात्र, त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवा व्हायरस सापडला. यानंतर परत त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या निधनाने राज्याने आणि देशपातळीवरील राजकारणाने एक अभ्यासू, तडफदार आणि धडाडीचा नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
Read Also :
- वीज कापणार नाही, ट्रान्सफॉर्मरही बसवणार नाही, या सरकारला शेतकऱ्यांच्या फक्त पुळका- डॉ. अनिल बोंडे
- “नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघात मृतदेहाचा रोजच्यारोज पडतोय ढिग” नाना पटोले
- उजनीचा पाणी प्रश्न: इंदापूरला नेण्यात येणारे पाणी रद्द करा; नाहीतर…नारायण पाटलांचा इशारा!
- शेतकऱ्यांच्या पाठीमागे उपमुख्यमंत्री, केंद्राला केली खतांच्या किंमती कमी करण्याचे आवाहन
- वीज कापणार नाही, ट्रान्सफॉर्मरही बसवणार नाही, या सरकारला शेतकऱ्यांच्या फक्त पुळका- डॉ. अनिल बोंडे