मुंबई : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार करत असल्याची भूमिका सातत्याने सत्ताधारी पक्षाकडून घेतली जाते. आघाडी सरकारच्या मंत्र्यांच्या तोंडी देखील शेतकरी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची भाषा असते.
मात्र, याला छेद देणारी एक ऑडिओ क्लिप (श्राव्य संवाद) माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी ट्विटर वर शेअर केली असून, “उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापणार नाही. आणि इंजिनियर पैसे भरल्याशिवाय ट्रान्सफॉर्मर बसवायला तयार नाही. आता शेतकऱ्यांनी काय करावे?”, असा सवाल त्यांनी याद्वारे उपस्थित केला आहे.
त्यांनी शेअर केलेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये, महावितरणचा इंजिनियर दुसऱ्या व्यक्तीला, शेतकऱ्यांना वीजबिलाचे पैसे भरायला सांगा, तेव्हाच विद्युत पुरवठा सुरळीत केला जाईल, असे सांगताना ऐकू येत आहे, तर दुसरा व्यक्ती त्यांना कळकळीने समजावण्याचा प्रयत्न करत आहे; की सध्याच्या परिस्थितीमुळे शेतकऱ्याची वीजबिल भरण्याची देखील परिस्थिती नाहीये.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापणार नाही. आणि इंजिनियर पैसे भरल्याशिवाय ट्रान्सफॉर्मर बसवायला तयार नाही.
आता शेतकऱ्यांनी काय करावे? @BJP4Maharashtra @AjitPawarSpeaks pic.twitter.com/2btR4Dxj6z— Dr. Anil Bonde (@DoctorAnilBonde) May 15, 2021
तसेच, या ऑडिओ क्लिपमधून प्रशासनाचा गोंधळी कारभार देखील समोर येत असून, काही ठिकाणी पैसे न घेता, काही ठिकाणी वीजबिलाची पूर्ण, तर कुठे ८० % रक्कम आणि कुठे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी, पैसे भरावे लागतील असे सांगून शेतकऱ्याची अडवणूक केली जात असल्याचे दिसत आहे.
त्यामुळे, सर्व प्रकारे अडचणीत सापडलेल्या बळीराजाच्या मदतीला राज्यातील सरकार कशा प्रकारे हात देत आहे आणि मोठ्या तोंडी केलेली सरसकट वीजबिलाची शिवगर्जना केवळ तोंडच्या वाफा असल्याचेच सिद्ध झाले आहे.
Read Also :
- राज्यात कपाळकरंटे आणि पांढऱ्या पायाचे सरकार आले आणि आमचे…सदाभाऊ खोतांची टीका
- दोषींवर रितसर कारवाई करा; अण्णा बनसोडे व विलास लांडेच्या दोस्तीला अजित पवारांचा छेद
- पंतप्रधानांवर मुख्यमंत्र्यांचा प्रभाव, म्हणून दाखल केली पुनर्विचार याचिका
- उजनीचा पाणी प्रश्न: इंदापूरला नेण्यात येणारे पाणी रद्द करा; नाहीतर…नारायण पाटलांचा इशारा!
- भर बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर भिडले उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री, आघाडीमध्ये वादाची ठिणगी