मुंबई : आज बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खरीप आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी महामारी परिस्थितीचा देखील आढावा घेतला. तसेच, बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी, केंद्र सरकारने खतांच्या वाढलेल्या किंमती कमी करुन मायबाप शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.
“खतांच्या वाढलेल्या किमतींना पूर्णपणे केंद्र जबाबदार असून, या किंमती कमी करण्यासाठी त्यांनी पावले उचलावीत. याचसोबत केंद्राने शेतकऱ्यांना खते पुरवावीत. केंद्राच्या या निर्णयामुळे शेतकरी परत युरियाच्या वापराकडे वळतील”, अशी भीती व्यक्त करताना त्यांनी, “खतांच्या किंमती मोदी सरकारने वाढवलेल्या असल्या तरीही, शेतक-यांनी मात्र युरीयाकडे वळू नये, असे आवाहन केले आहे.
यावेळी, देशाला लसींची जितकी गरज आहे, तितकी मिळत नाहीये, त्यामुळे लसींचे उत्पादन करणाऱ्या भारत बायोटेक कंपनीला पुण्यात जागा उपलब्ध करुन दिली असून, लवकरात लवकर त्या ठिकाणी लसनिर्मितीची प्रक्रिया सुरु होईल”, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
दरम्यान, म्युकरमायसिस या बुरशीजन्य आजाराबाबत देखील राज्य शासनाने वैद्यकीय तज्ज्ञांना माहिती दिली असून, या आजाराची कारणे काय आहेत, याचीही माहिती मिळाली आहे, बारामतीतही प्रांताधिकारी व डॉक्टरांना या बाबतच्या सूचना दिलेल्या आहेत, खाजगी डॉक्टरांनाही या आजाराची माहिती देण्यास सांगितले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Read Aslo :
- माश्याच मारण्याचीच स्पर्धा असेल, तर गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील जनता तेच बघत आहे
- महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि माझ्याइतके काम कोणत्याच नेत्याने केले नाही – चंद्रकांत पाटील
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमदार गोपीचंद पडळकराचे यांचे पत्र
- अनेक वादळं येतील जातील, आधी देशातले महामारीचे वादळ थांबवा
- ‘सत्ताधारी असूनही अशोक चव्हाणांना टीकेचीच सवय’