मुंबई : ‘ताऊते’ चक्रीवादळ ताशी ६०-७० किमी प्रतितास या वेगाने हे अरबी समुद्रात हे चक्रीवादळ सध्या महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकत असून, चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. याचाच संदर्भ घेऊन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला टोकले आहे.
“अनेक वादळं येतील आणि जातील, पण या चक्रीवादळापेक्षाही सध्या देशात असलेलं महामारीचं वादळ भयानक आहे. ते आधी थांबवलं पाहिजे. आधी त्यासाठी काम करा, या वादळाने देशात रोज मृत्यूच्या राशी पडत आहेत. त्याचं काय करणार? अशा शब्दात त्यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
तसेच, लसीकरणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना, “लसीकरणाच्या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये चर्चा सुरू आहेत. आशा आहे त्यातून लवकरच सकारात्मक मार्ग निघेल”, असे सांगत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे फोन टॅपिंग प्रकारणावरही त्यांनी मत मांडलं. “देशामध्ये कुणाचे फोन टॅप होत नाहीत, हे मला सांगा. आमचे देखील झाले आहेत आणि अजूनही होत असतील. फोन टॅपिंग ही आता राजनैतिक बाब झाली आहे. असल्या घटनेला आता आम्ही गंभीरतेने घेत नाही. हे एक विरोधकांना ब्लॅकमेल करण्याचं अस्त्र बनलं आहे. नाना पटोले यांनी देखील घाबरून जाऊ नये,” असा सल्ला राऊत यांनी पटोलेंना दिला आहे.
Read Also :
- ‘सत्ताधारी असूनही अशोक चव्हाणांना टीकेचीच सवय’
- खासदार राजीव सातव यांची प्रकृती गंभीर; बाळासाहेब थोरात दुपारी घेणार भेट
- फडणवीसांचा नवा डाव, ना मोदी ना पवार थेट लिहिले सोनिया गांधींना पत्र
- फडणवीसांना दुसरं काम काय, भाजपने आता माशा मारण्याची स्पर्धा भरवावी
- आठवलेंचा आमदार आठवलेंनाच विसरला; आठवले गटात फुट