कोल्हापूर : राज्य सरकाराकडून, कोरोना परिस्थी आटोक्यात येत नसल्याने वेळोवेळी लॉकडाऊन वाढवण्यात आला. यावेळी देखील ग्रामीण भंगार करोनाचा शिरकाव जास्त झाल्याने परत लॉकडाऊन वाढवून १ जून पर्यंत केला आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सडकून टीका केली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, “राज्यात एकीकडे कोरोनाचा वाढत्या प्रदुर्भावामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या जात आहे, तसेच गोकुळच्या निडणुक घेण्या करिता परवानगी कशी मिळते तेव्हा कोरोनाचा संसर्ग होत नाही का? निडवडणुकीचे निकाल हाती येताच कोल्हापूर शहरात-जिल्ह्यात कडक निर्बधासहित लाँकडाऊन लावण्यात येते. तसेच मराठा आरक्षणासाठी होणारी आंदोलने थांबवण्यासाठीच हा लॉकडाऊन असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी केली आहे.
समाजातील विविध घटकांना अजूनही मदत मिळाली नसल्याचे सांगत असे गेंड्याच्या कातडीचे सरकार बघितले नसल्याची टीका पाटील यांनी केली आहे. कोल्हापूरकरांना फक्त वैद्यकीय कारणासाठी घराबाहेर पडता येणार आहे. किरणामाल, भाजीपाला दुकानेदेखील या काळात बंद राहणार आहे. जिल्ह्यात फक्त दूध विक्री केंद्र आणि दूध संकलन केंद्र सुरू राहणार आहेत. शेतीशी संबधीत कामं सुरू ठेवण्याला जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Read Also :
- सातव यांच्या जाण्याने ‘मित्र गमवल्याची’ राहुल गांधीची भावना तर पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त
- “शेण, गोमूत्र व यज्ञावरच भागवावे लागेल काय?”; मोदींना संजय राऊतांचा सवाल
- राजकीय नेत्यांनी दिली समाज माध्यमांवरून, राजीव सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली
- वीज कापणार नाही, ट्रान्सफॉर्मरही बसवणार नाही, या सरकारला शेतकऱ्यांच्या फक्त पुळका- डॉ. अनिल बोंडे
- राज्यात कपाळकरंटे आणि पांढऱ्या पायाचे सरकार आले आणि आमचे…सदाभाऊ खोतांची टीका