मुंबई : गेल्या काही दिवसांपासून करोनाशी झुंज देत असलेले काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे निधन झाले. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात मागील २० दिवसांपासून उपचार सुरू होते. सुरूवातील त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र, नंतर त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली होती. मात्र, दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती पुन्हा खालावली होती. त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवल्याचंच वृत्त काँग्रेसकडून देण्यात आले.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार आणि पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हणाले की, राजीव सातव यांच्या निधनाने काँग्रेसवर शोककळा पसरली आहे. तरुण नेता गमावल्याने काँग्रेस नेतृत्वालाही धक्का बसला आहे. पंतप्रधान मोदींनीही ट्वीट करून शोक व्यक्त केला आहे.
Anguished by the passing away of my friend from Parliament, Shri Rajeev Satav Ji. He was an upcoming leader with much potential. Condolences to his family, friends and supporters. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) May 16, 2021
राहुल गांधी म्हणाले…
मी मित्राला गमवले आहे. खूप दुःखी झालो आहे. राजीव सातव हे अतिशय हुशार, उमदे आणि उच्च क्षमता असलेले नेते होते. त्यांच्या निधनाने काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. सातव यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. सातव हे राहुल गांधीचे अतिशय निकटवर्तीय होते.
I’m very sad at the loss of my friend Rajeev Satav. He was a leader with huge potential who embodied the ideals of the Congress.
It’s a big loss for us all. My condolences and love to his family. pic.twitter.com/mineA81UYJ
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 16, 2021
सुप्रिया सुळे झाल्या भावूक
सातव यांच्या जाण्याचे वृत्तानंतर खासदार सुप्रिया सुळे झाल्या भावूक. “काँग्रेसचे खासदार व आमचे संसदेतील सहकारी राजीवजी सातव यांचे निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद बातमी आहे. त्यांनी करोना विषाणूशी जोरदार झुंज दिली. पण ही झुंज अपयशी ठरली. ते एक उत्तम संसदपटू तर होतेच याशिवाय ते माणुसकी जपणारे नेते होते. त्यांच्या अकाली जाण्यामुळे महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. लोकशाही, धर्मनिरपेक्षता व समतेच्या मूल्यांवर श्रद्धा असणारा व त्यासाठी संघर्ष करणारा एक तरुण नेता आहे पण गमावला. या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण सातव कुटुंबियांसमवेत आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली,” असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी दुःख व्यक्त केले आहे.
त्यांच्या अकाली जाण्यामुळे महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे.लोकशाही, धर्मनिरपेक्षता व समतेच्या मूल्यांवर श्रद्धा असणारा व त्यासाठी संघर्ष करणारा एक तरुण नेता आहे पण गमावला. या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण सातव कुटुंबियांसमवेत आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/4GiYGi3xSC
— Supriya Sule (@supriya_sule) May 16, 2021
Read Also :
- राजकीय नेत्यांनी दिली समाज माध्यमांवरून, राजीव सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली
- जिथे जन्म तिथेच मृत्यू.! खासदार राजीव सातव यांचा 46 वर्षाचा प्रवास….!
- राज्याने गमावला अभ्यासू नेता, काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन
- वीज कापणार नाही, ट्रान्सफॉर्मरही बसवणार नाही, या सरकारला शेतकऱ्यांच्या फक्त पुळका- डॉ. अनिल बोंडे
- “शेण, गोमूत्र व यज्ञावरच भागवावे लागेल काय?”; मोदींना संजय राऊतांचा सवाल