मुंबई : देशातल्या महामारीच्या परिस्थितीवरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते. तसेच, केंद्र सरकार दुसऱ्या लाटेला रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका अनेक राजकीय पक्षांकडून मोदी सरकावर ठेवण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट एक पत्र सोनिया गांधींना लिहून, त्यांना, त्यांचे सरकार असलेल्या महाराष्ट्रातील स्थितीची आणि त्याचा संपूर्ण देशातील महामारीच्या लढ्यावर होणाऱ्या परिणामाची जाणीव करून दिली.
दरम्यान, यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांवर निशाणा साधत, “सोनिया गांधी यांना पत्र लिहून, देशाचे स्मशान बनविणा-या नरेंद्र मोदींच्या पापावर पांघरून घालण्याचा प्रयत्न फडणवीस करत आहेत. असेच धाडस दाखवून त्यांनी मोदींना पत्र लिहून दाखवावे,” असं आव्हान दिलं होतं.
हातात याला फडणवीसांनी प्रतिउत्तर केले असून, “मी पंतप्रधांनांना नेहमीच पत्रं लिहीत असतो. राज्याला आवश्यक ती मदत त्यांच्याकडून मागत असतो आणि त्यांच्याकडून ती मदत मिळते देखील. आज सर्वाधिक व्हेंटिलेटर मोदींनी महाराष्ट्राला दिले. सर्वाधिक रेमडेसिवीर देखील त्यांनीच दिले, पण काहींना कांगावा करण्याची सवय आहे. अशा कांगावाखोरांना मी उत्तरे देत नाही,” असा शाब्दिक हल्ला त्यांनी पटोले यांच्यावर केला आहे.
Read Also :
- मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला…
- गेंड्याच्या कातडीचे सरकार ‘मी’ कधी बघितलेच नाही – चंद्रकांत पाटील
- “शेण, गोमूत्र व यज्ञावरच भागवावे लागेल काय?”; मोदींना संजय राऊतांचा सवाल
- वीज कापणार नाही, ट्रान्सफॉर्मरही बसवणार नाही, या सरकारला शेतकऱ्यांच्या फक्त पुळका- डॉ. अनिल बोंडे
- राज्यात कपाळकरंटे आणि पांढऱ्या पायाचे सरकार आले आणि आमचे…सदाभाऊ खोतांची टीका