नाशिक : गेल्या अनेक दिवसापासून नाशिक लोकसभा मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडतांना दिसत आहे. महाविकास आघाडीकडून नाशिक मतदारसंघातून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे महायुतीचा उमेदवार अद्यापही ठरलेला नाहीय. अशातच काल मंत्री गिरीश महाजन यांनी शिंदे गटातील पदाधिकारी तसेच शांतिगीरी महाराजांनी भेट घेतली. तर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत नाशिक येथे चर्चा केली. यानंतर नाशिकची जागा ही शिंदेंचीच असल्याने ते यासंदर्भात निर्णय घेतील. असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेचा पेच अद्यापही कायम राहिलं आहे.
हेही वाचा..“सुनेत्रा पवारांचा पायगुण चांगला, आताच तर इतकं, तर खासदार झाल्यात तर काय होईल विचार करा,”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जागा असल्याने नाशिकचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांचाच आहे. शांतिगीरी महाराजांच्या अनुयांनी आमची भेट घेतली आहे. परंतु त्यासंदर्भात निर्णय हा शिंदेंनीच घ्यायचा आहे. एकदा शिंदेंनी याठिकाणी उमेदवार घोषीत केला तर आमची सगळी तयारी करून ठेवली आहे. त्या उमेवारांसाठी आम्हाला काम करावेच लागेल. त्यांना ५१ टक्के मतदान करून त्यांना निवडून आणण्याचं काम आमचं आहे. असेही बावनकुळे म्हणाले.
नाशिकची जागा ही आमच्या हातून जाणार नाही. त्यासाठी अजून १८ दिवस बाकी आहे. नाशिक मतदारसंघात महायुती मजबुत आहे. उमेदवार निश्चित झाला की आम्ही तशी तयारी सुरू करू. असेही बावनकुळे म्हणाले. देशाचे पंतप्रधान करायचे तर नाशिककर नरेंद्र मोदी यांचा नाव घेतात. त्यामुळे कोणताही उमेदवार उभा राहिला तर याठिकाणी तो निवडून येईल कारण त्याचं मत थेट नरेंद्र मोदींना जाणार असल्याचेही बावनकुळेंनी म्हटलं.
हेही वाचा…“आढळरावांनी वाडा गावच्या विकासासाठी विविध प्रकारचा निधी पोहोचवला”
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी छगन भुजबळ यांचं नाव सुचवलं होतं, मग त्याला शिवसेना शिंदे गटाचा कि भाजपचा विरोध होता. त्यावर बोलतांना बावनकुळे म्हणाले की, कोणाचाच विरोध होत नसतो. महायुती असल्याने काही जागांचा त्याग करावा लागतो. रामटेकमध्ये भाजपचे सर्व आमदार, नगरसेवक असल्याने ती जागा आम्ही घेतली. त्यावेळी जागा कशी कमी करायची ? त्याबद्दल विचार करावा. लागतो. त्यामुळे महायुतीच्या राजकारणात याचा सर्व विचार करावा लागतो. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे ही जागा असल्याने त्यांना आम्हाला नाही सांगता येत नाही. असेही ते म्हणाले.
विजय करंजकर माझ्या संपर्कात नाही आहेत. त्यांनी गिरीश महाजन यांची भेट घेतली असेल. पण भेट झाली म्हणजे उमेदवारी दिली असं होत नव्हतं. एकनाथ शिंदे यांच्याकडे जागा असल्याने अडचण निर्माण झाली आहे. नरेंद्र मोदी यांना मत द्यायचं आहे. काही काळ कार्यकर्ते नाराज होतात. पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी असल्याने महायुतीत कोणाकडेही जागा पाडण्याची हिमंत नाही आहे. यातच उद्या दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार भारती पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये येत आहेत. जर आज नाशिकची जागा जाहीर झाली तर उद्या दोन्ही उमेदवार अर्ज दाखल करतील. असेही बावनकुळे म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“सुनिल तटकरे हा तुमचा सेवक म्हणून याठिकाणी..” सुनील तटकरेंनी मतदारांना दिला ‘हा’ शब्द
हेही वाचा…“पुणे लोकसभेची जागा सहजासहजी जिंकू’, संजय काकडे पुन्हा ‘अॅक्टिव मोड’मध्ये