पुणे : “देशात कोरोनाने थैमान घातलेले असताना, काही नागरिकांना अजूनही लशीचा पहिला डोस सुद्धा मिळालेला नाही. लसीकरण केंद्राबाहेर लोक रांगा लावून लसींच्या प्रतिक्षेत उभे आहेत. तर दुसरीकडे केंद्र सरकारने जगभरात लशी फुकट वाटल्या आहेत. हे म्हणजे घरात नाही दाणा पण मला “वॅक्सिन गुरू” म्हणा असे झाले आहे. तसेच राज्यातील काही लसीकरण केद्र बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. केंद्र सरकारच्या पापाचे फळ सामान्य जनतेला भोगावे लागत आहे”, अशा शब्दात रुपाली चाकणकर यांनी केंद्र सरकारवर टिका केली आहे.
घरात नाही दाणा पण मला "वॅक्सिन गुरू" म्हणा…
भारतीय नागरिकांना लसीकरणापासून वंचित ठेवून केंद्र सरकारने जगभरात या लसी फुकट वाटल्या. केंद्र सरकारच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागत आहे. या पापाचं प्रायश्चित्त भाजपला करावंच लागेल.#vaccine @PMOIndia pic.twitter.com/60FTKjJUCU— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 17, 2021
“देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहे. सध्या लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळत आहे. परंतु केंद्र सरकारकडून राज्यांना पाहिजे त्या प्रमाणात लसींचा पुरवठा होत नसल्या कारणाने, राज्याकडून लसीकरण केंद्र बंद केली जात आहेत, असे चित्र सर्वत्र बघायला मिळत आहे. यासर्व परिस्थीला जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत”, अशी टीका रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
हेही वाचा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी देशात 2.81 लाख रुग्ण आढळले आहेत. तर 4,106 जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत तीन लाख 78 हजार 741 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोन कोटी 49 लाख 65 हजार 463 इतकी झाली आहे. तर देशात आतापर्यंत दोन कोटी 11 लाख 74 हजार 76 जणांनी कोरोनावर मात (Total discharges) केली आहे. देशातील एकूण कोरोना मृताची (Death toll) संख्या दोन लाख 74 हजार 390 इतकी झाली आहे. देशात सध्या 35 लाख 16 हजार 997 रुग्ण उपचाराधीन आहेत.
Read Also :
- “साहेब काहीतरी करा, नाहीतर २०२४ मध्ये आपला पक्ष…”; कट्टर भाजप समर्थकाची ऑडिओ क्लिप व्हायरल
- मराठी कलाकारांची उपासमार; देंवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आमदार महेश लांडगे सरसावले
- ‘दादा’ आमचे हक्क म्हणजे काय सापशिडीचा खेळ वाटतोय काय?
- “…म्हणून आपण मनोरुग्ण झाले आहात, सांभाळा स्वतःला”, सातपुतेंचा शाब्दिक हल्लाबोल
- देशात रुग्णसंख्या तीन लाखांच्या खाली, मृतांची संख्या चिंता वाढवणारी