मुंबई : भारतामधील महामारीने बाधित रुग्णवाढीचा वेग मंदावला असला तरी, मृतांच्या संख्येत सातत्यानं वाढ होताना पाहायला मिळत आहे. तसेच, देशात ओक्सजीं, रेमेडिसिवीर आणि इतर औषधे, तसेच लसींचा देखील तुटवडा जाणवत आहे.
दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडीतील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलीक यांनी देखील यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला असून, “परदेशात हक्काची लस पाठवली तर लोक प्रश्न विचारणारच. किती लोकांना भाजप सरकार अटक करणार आह, लोकांचा आवाज दाबण्याची ही केंद्र सरकारची कायरता आहे,” असा हल्लबोल त्यांनी केला आहे. तसेच, संपूर्ण देश एक होत आहे. आम्हीही बघतो तुम्ही किती लोकांना अटक करताय, असे आव्हान देखील त्यांनी केंद्र सरकारला दिले आहे.
तसेच, “डाओसमध्ये पंतप्रधान मोदींनी आम्ही ‘लसगुरु’ बनल्याचे जाहीर केले. यूएनमधील भारतीय दुतावासाने सांगितले की, जेवढ्या प्रमाणात लसीकरण देशात झाले नाही, त्यापेक्षा जास्त लशी परदेशात पाठवण्यात आल्या आहेत. मात्र, केंद्र सरकार एकीकडे केवळ एक कोटी लस पाठवल्याचेच सांगत आहे, दुसरीकडे काहीजण ५ कोटी लसी पाठवल्याचे बोलत आहेत. देशात लसींची कमतरता असतानाच हे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.”
“मोदीजी, आमच्या मुलांच्या हक्काची लस विदेशात का पाठवली, अशी पोस्टर्स काही लोकांनी चिकटवली आहेत, तर भाजपचे काही लोक लहान मुलांची लस तयारच झाली नसल्याचे बोलत आहेत. लस परदेशात पाठवली तर, लोकं प्रश्न विचारणारच! परंतु केंद्र सरकार सवाल विचारणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करुन, त्यांना जेलमध्ये टाकत आहे. बघूया असं किती लोकांना अटक करताय तुम्ही मोदीजी”, असा घणाघात त्यांनी केला आहे.
Read Also :
- घरात नाही दाणा पण, मला “वॅक्सिन गुरू” म्हणा…
- “साहेब काहीतरी करा, नाहीतर २०२४ मध्ये आपला पक्ष…”; कट्टर भाजप समर्थकाची ऑडिओ क्लिप व्हायरल
- ‘दादा’ आमचे हक्क म्हणजे काय सापशिडीचा खेळ वाटतोय काय?
- “…म्हणून आपण मनोरुग्ण झाले आहात, सांभाळा स्वतःला”, सातपुतेंचा शाब्दिक हल्लाबोल
- देशात रुग्णसंख्या तीन लाखांच्या खाली, मृतांची संख्या चिंता वाढवणारी