मुंबई : सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री दत्तात्रय भरणेंनी, इंदापूर तालुक्यातील २२ गावांसाठी उजनी धरणातून सांडपाणी योजनेच्या नावाखाली ५ टीएमसी पाणी वळवण्याचा निर्णय घेतल्यवार, याला सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध दर्शवला आहे.
या पार्श्वभूमीवर आज सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांच्या चीक महुद येथील निवासस्थानासमोर उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने हलगी नाद आंदोलन केले. यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी धरणातून पाच टीएमसी इंदापूरला देण्यास तीव्र विरोध दर्शवत, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
“राज्यात जेव्हा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या पाठिंब्याचे सरकार आले आहे, तेव्हा त्यांनी फक्त बारामतीचाच विकास केला आहे. सगळा निधी बारामतीला न्यायचा आणि बारामती विकास मॉडेलबद्दल देशभर चर्चा घडवून आणायची हीच पवारांची पद्धत आहे”, असा आरोप त्यांनी पवारांवर केला आहे.
तसेच, “या पद्धतीचा निर्णय संघर्ष डावलून झालाच, तर रक्तरंजित लढाईला तयार राहा,” असा इशाराही त्यांनी महाविकास आघाडीला दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांनीच सरकारला घरचा आहेर दिल्याने, उजनीच्या पाणी संघर्षांवरून आघाडीत खळबळ होण्याची शक्यता आहे.
Read Also :
- “पुन्हा एकदा तोडले का अकलेचे तारे”; उमा खापरेंची, रुपाली चाकणकरांवर टीका
- “रेमेडीसीवर घोटाळ्यात अडकलेत मोठे मासे…”; फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना पत्र
- “देशात व्हेंटीलेटर्स आणि मोदी दोन्हीही बिनकामाचे”
- “भाजपविरोधात संपूर्ण देश एकजूट, आम्हीही पाहून घेऊ किती लोकांना अटक करताय”
- घरात नाही दाणा पण, मला “वॅक्सिन गुरू” म्हणा…