मुंबई : एकीकडे राज्यात महामारीचे संकट गडद होत असताना, अजून एक संकट मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागांत घोंगावत आहे, ते म्हणजे तौत्के चक्रीवादळाचे. यामुळे सध्या किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा दिला असून, याचा प्रभाव राज्याभरात जाणवत आहे.
या नैसर्गिक आपत्तीच्या काळात सगळ्या प्रशासन यंत्रणा सतर्क असून, पोलीस दल देखील रस्त्यावर कर्तव्य बजावत आहे. मात्र, या सगळ्यात महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे, राज्याच्या गृहमंत्र्यांची परवानगी न घेता, चंदीगडला गेले असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या या अशा जाण्यामागे आता अनेक तर्क वितरक लढवले जात असून, राज्यात चक्रीवादळासारखी महत्वाची आपत्ती तोंडावर असताना पोलीस महासंचालकांचे राज्याबाहेर सुट्टीवर जाणे, आश्चर्याचे मानले जात आहे. तसेच, त्यांच्या या वर्तणुकीवर शिवसेनेकडून कारवाईची देखील मागणी केली जात असल्याचे कळते आहे.
संजय पांडे हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी असून नुकत्यात झालेल्या बदलीमुळे ते राज्य सरकारवर नाराज होते. संजय पांडे हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागल्याने संजय पांडे यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या असणाऱ्या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
Read Also :
- ‘घरी राहून काम खूप झाले, आता मंत्रालयातून काम कधी करणार?’
- “आता काहीही बोलण्यासारखं राहिलं नाहीये” म्हणत, केंद्रीय समितीतील वैद्याने दिला राजीनामा
- आंदोलन थांबलं नाही! थांबणार नाही! मराठा आंदोलनात भाजप होणार सहभागी
- “…तर उजनीसाठी रक्तही सांडू”, शिवसेना आमदाराची शिवगर्जना
- “पुन्हा एकदा तोडले का अकलेचे तारे”; उमा खापरेंची, रुपाली चाकणकरांवर टीका