मुंबई : एकीकडे राज्यात महामारीचे संकट गडद होत असताना, अजून एक संकट मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागांत घोंगावत आहे, ते म्हणजे तौत्के चक्रीवादळाचे. यामुळे सध्या किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा दिला असून, याचा प्रभाव राज्याभरात जाणवत आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, चक्रीवादळामुळे राज्याच्या किनारपट्टी भागातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने, नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तसेच कोकण प्रभारी नसीम खान यांनी केली आहे.
यासंदर्भातले पत्र नसीम खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना लिहिले असून, स्थानिक लोकांना राज्य सरकारने आर्थिक मदत देण्याची नितांत गरज असल्याची मागणी त्यांनी पत्रात केली आहे.
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून तौक्ते चक्रीवादळाचा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि आजुबाजूच्या प्रदेशाला जोरदार फटका बसला असून, जोरदार वाऱ्यासोबत झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकणातल्या फळबागांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून, घरांचे पत्रे देखील उडून गेले आहेत. किनाऱ्यावर देखील मच्छिमारांच्या बोटींचे नुकसान झाल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.
त्यामुळे आधीच महामारीच्या संकटाचा सामना करत असलेल्या जनतेला, या वादळाने फटका बसून मोठे नुकसान झाल्याने. या परिस्थितीचा राज्य सरकारने गांभीर्याने विचार करुन, तातडीने नुकसान भरपाईचे आदेश देऊन, या भागातल्या लोकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नसीम खान यांनी केली आहे.
Read Also :
- लवकरच आणखीन एक वादळ? गृहमंत्र्यांची परवानगी न घेता राज्याचे महासंचालक चंदीगडला!
- ‘घरी राहून काम खूप झाले, आता मंत्रालयातून काम कधी करणार?’
- “आता काहीही बोलण्यासारखं राहिलं नाहीये” म्हणत, केंद्रीय समितीतील वैद्याने दिला राजीनामा
- आंदोलन थांबलं नाही! थांबणार नाही! मराठा आंदोलनात भाजप होणार सहभागी
- “…तर उजनीसाठी रक्तही सांडू”, शिवसेना आमदाराची शिवगर्जना