मुंबई : अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळाने रौद्ररूप धारण करत सोमवारी कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे, पालघरला तडाखा दिला.चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळून मोठं नुकसान झालं आहे. चक्रीवादळामुळे राज्यात नऊ जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे आठ हजार घरांचे नुकसान झाले.
मात्र, तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा अलर्टवर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केलेल्या एका ट्विटची मात्र चर्चा रंगली आहे. ‘तौक्ते वादळ राष्ट्रीय वादळ आहे, त्याने महाराष्ट्राचा नाद करू नये’, असे अजब ट्विट मिटकरींनी केले आहे.
तौक्ते वादळ राष्ट्रीय वादळ आहे. त्याने महाराष्ट्राचा नाद करू नये. राष्ट्रीय स्तरावरील वादळ असल्यामुळे याची चिंता दिल्लीश्वरांनी करावी. छ. शिवरायांचे राज्य असे अनेक वादळ परतून लावतो.ती हिम्मत दिल्लीश्वर व इथल्या 106 शिपायांमध्ये नाही.#सुरीले तौक्ते वादळ. pic.twitter.com/Cs1Zimv36R
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 17, 2021
तौक्ते वादळ राष्ट्रीय वादळ आहे. त्याने महाराष्ट्राचा नाद करू नये. राष्ट्रीय स्तरावरील वादळ असल्यामुळे याची चिंता दिल्लीश्वरांनी करावी. छ. शिवरायांचे राज्य असे अनेक वादळ परतून लावतो.ती हिम्मत दिल्लीश्वर व इथल्या 106 शिपायांमध्ये नाही, अशा शब्दात त्यांनी चक्रीवादळाच्या निमित्ताने भाजप नेत्यांवर देखील टीकेची तोफ डागली. त्यांचे हे ट्विट व्हायरल होत आहे.
दरम्यान, तौक्ते चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकलं आहे. गुजरातच्या दिशेने जाताना चक्रीवादळाने सोमवारी कोकणासह मुंबई, ठाणे, पालघरमध्ये धुमाकूळ घातला. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर जिल्ह्य़ांच्या किनारपट्टीवरील घरांचे आणि शेतीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले.
Read Also :
- ‘एकाचे लक्ष मुंबईवर तर दुसऱ्याचे बारामतीवर, उर्वरित राज्य वाऱ्यावर’
- काँग्रेसची आग्रही मागणी, तातडीने नुकसानीचे पंचनामे करा
- लवकरच आणखीन एक वादळ? गृहमंत्र्यांची परवानगी न घेता राज्याचे महासंचालक चंदीगडला!
- ‘घरी राहून काम खूप झाले, आता मंत्रालयातून काम कधी करणार?’
- “आता काहीही बोलण्यासारखं राहिलं नाहीये” म्हणत, केंद्रीय समितीतील वैद्याने दिला राजीनामा