अमरावती: भाजपा समर्थक अमरावतीचे आमदार रवी राणी यांची चिभ घसरली आहे. एपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मुद्दयावरुन प्रश्न विचारले असतात राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री वारंवार सांगूनही ऐकत नसेल तर मी आता मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर जाऊन बेशरमाचं झाड लावणार असल्याचे रवी राणांनी जाहीर केले.
रवी राणांनी फेसबुक लाईव्ह करत मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला. कोरोनाच्या काळात ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार झाला, अनेकांनी आपल्या कुटुंबातील व्यक्ती गमावल्या. महाराष्ट्रातल्या शेतकरी, शेतमजूर, स्वप्नील लोणकरसारख्या युवकांच्या आत्महत्येचा राज्याचे मुख्यमंत्री दखल घेत नसतील तर मी स्वतः येणाऱ्या काळात मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रीच्या बाहेर बेशरमाचं झाड लावणार आहे.
या बेशरमच्या झाडाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला संदेश जाईल, की कितीही ओरडलो, कितीही वेळा बोललो, कितीही वेळा मागणी केली, तरी राज्याचे मुख्यमंत्री बेशरम आहेत. त्यांना बेशरमचं झाडंच लागू पडेल. त्यामुळे मी येणाऱ्या काळात बेशरमचं झाड लावणार आहे. जेणेकरून त्यांच्यामध्ये काही ना काही परिवर्तन होईल आणि ते दिलासा देण्याचा निर्णय घेतील, असंही रवी राणा म्हणाले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष भास्कर जाधव या तिघांनाही माझं एकच म्हणणं आहे की, स्वप्नील लोणकर हा गरीब कुटुंबातील आहे. स्वप्नीलच्या आईनं त्याला शिकवण्यासाठी कर्ज काढलं होतं. ते कर्ज फेडू शकत नसल्यानं स्वप्नील लोणकरनं आत्महत्या केली. स्वप्नील लोणकरच्या कुटुंबाला एक कोटी त्वरित द्यावे, अशी मी मागणी केली होती, जेणेकरून त्या कुटुंबाला आधार होईल. स्वप्नील लोणकरवर मुख्यमंत्री काही बोलले नाहीत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आलीय, त्यावरही मुख्यमंत्री काही बोलत नाही. मुख्यमंत्री फक्त स्वतःची वाह वाह करून घेत असल्याची टीकाही रवी राणांनी केली.