जालना : देशात आणि राज्यात महामारीच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं. मात्र आता ही लाट पूर्णपणे ओसरली आहे. परंतु, देशाच्या आणि राज्याच्या टास्क फोर्सने देशात तिसऱ्या लाटेची शक्यता सांगितली असून, त्या दृष्टीने राज्यात, राज्य सरकारकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.
भाजपला सर्वात मोठा धक्का! पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार, राजकीय चर्चेला उधान
मात्र असे असले तरीही, राज्यातले निर्बंध पूर्णतः शिथिल न झाल्यामुळे जनता त्रस्त आहे. त्यामुळे, “एकतर सगळे निर्बंध कायमचे काढून टाकून, नागरिकांना पूर्ण दिलासा द्यावा किंवा संपूर्ण लॉकडाऊन करावा,” अशी विनंती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे. जालन्यामध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
सोबत राहून पाठीत सुरा खुपसायचा आणि बोलायचे नाही; नाना पटोले यांची शिवसेना-राष्ट्रवादीवर टीका
तसेच, “जिथे महामारीची परिस्थिती गंभीर आहे, तिथेच हे निर्बंध लागू करावेत, परंतु, जिथं परिस्थिती नियंत्रणात आहे, तिथे नागरिकांना व्यापार आणि दैनंदिन व्यवहाराची पूर्णतः परवानगी देण्यात यावी, सर्व निर्बंध काढून टाकण्यात यावेत. हा मुख्यमंत्र्यांना बोलून दाखवला असून, मुख्यमंत्र्यांनी यावर अभ्यास करून, लवकरच आपला निर्णय जाहीर करतील,” असं त्यांनी म्हटलं आहे.
देश उलथवून टाकण्याच्या कटात हा ‘म्हातारा’ म्हणे सामील होता, कोणता देश? कोणाचा देश?
दरम्यान, राज्यातील दुसरी लाट नियंत्रणात आल्याने, राज्य सरकारने काही जिल्ह्यांना निर्बंधांतून सूट दिली होती. मात्र डेल्टा विषाणू सापडल्याने, तीनच आठवड्यात सरकारने घुमजाव केले आणि सगळीकडे निर्बंध लागू केले. त्यामुळे राज्यभरातील नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
Read Also :
- आम्ही काका-पुतण्याच्या ताटाखालचे मांजर नाही, काँग्रेस नेत्यांची पवारांवर टीका
- भास्कर जाधवा यांच्या ‘त्या’ इच्छेला बाळासाहेब थोरातांचा ब्रेक, म्हणाले, ‘काँग्रेसमध्येही असे अनेक भास्कर जाधव!
- राहुल गांधींना राष्ट्रीय नेता बोलल्याचं बैलांना आवडलं नसेल; फडणवीसांची काँग्रेसवर खोचक टीका
- मनसेची ठरणार पुणे महापालिका निवडणुकीसाठी रणणीती; राज ठाकरे दोन दिवस पुण्यात मुक्कामी
- मुख्यमंत्री वारंवार सांगूनही ऐकत नसेल, तर मी मातोश्रीसमोर जाऊन बेशरमाचं झाड लावणार?